शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 31, 2022 19:13 IST

उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटला असला तरी ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी वेगवेगळ्या वाहनांतून घरी दाखल झाले आहेत. मात्र, खड्ड्यांची समस्या त्यांची पाठ सोडत नाही. या खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पांना घरोघरी आणण्यात आले आहे. रस्त्यांची झालेली वाताहात, लोकांसमोर असलेले हे विघ्नं दूर करण्याची प्रार्थना विघ्नहर्त्याला घालावी लागत आहे.मालवण तालुक्याचा विविध भाग, कुडाळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते, कणकवली तळेरे ते वैभववाडी मार्ग, कणकवली तालुक्यातील कनेडी, नाटळ, सांगवे मार्गावर, फोंडा मार्गावर, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, दाणोली, आंबोली मार्गावर, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भाग असे सर्वच ग्रामीण भागातील रस्ते उखडून गेले आहेत.

धक्के खात गावातग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झाल्याने गावापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सवासाठी गावी न आलेले मुंबईकर यंदा जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र, उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे.

रस्त्यावर जागोजागी तळेयावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी तळे साचले. कोट्यवधीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्ती केली जात नाही. मग या निधीचे काय केले जाते, कोणत्या कामासाठी निधी खर्च होतो, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोट्यवधींचा निधी जातो कुठे ?पावसाळ्यात हे खड्डे भरले जात नाहीत. खड्ड्यांभोवती जमा झालेली खडी, वाळूही हटवली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहेत. ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. मग  कोटींचा निधी कुठे खर्च केला जातो, असा प्रश्न केला जात आहे.

मालवण तालुका खड्ड्यात हरविलामालवण तालुक्यातील बेळणे, राठीवडे, पोईप, विरण, बागायत मार्गे बिळवस, महान, आडारी रस्त्यावर बहुतांश भागात रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. आचरा, वायंगणी, हडी मालवण या मार्गाची तशीच अवस्था आहे. कणकवली आचरा मागर्गावरील बराचसा भाग खड्ड्यांनी व्यापला आहे. कुणकवळे, चाफेखोल, गोळवण, वडाचापाट म्हणा किवा चाैके आबंडोस माळगाव या मार्गावरही रस्तेच खड्ड्यात हरविले आहेत.

घाटरस्ते बनले बेभरवंशीसिंधुदुर्गात येणारे आंबोली, गगनबावडा (करूळ) किवा फोंडा या तिन्ही घाटमागर्गावरील रस्ते बेभरवंशी आहेत. याठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका तर आहेच. परंतु या घाटरस्त्यांना जोडणारे सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायबआधीच रस्ते नादुरुस्त झालेले असताना धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी होत असली तरी जिल्हा परिषदेकडे निधीच नसल्याने रस्ते दुरुस्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक