शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा !--परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर  टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या  प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व

ठळक मुद्देमतदारांना आवाहन ; कणकवलीत पत्रकार परिषद

 

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर  टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या  प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व लोकप्रतिनिधींना मतदारांनी याबाबत जाब विचारावा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी .असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे  केले.

      कणकवली येथील संपर्क कार्यालतात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, प्रसाद गावडे, गुरुदास गवंडे, सचिन तावडे, विनोद सांडव, गणेश वाईरकर, फास्कल रॉड्रिक्स आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने चार बळी गेले आहेत. माकडतापाने डोके वर काढले आहे . त्याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधींना नाही. जनतेच्या प्रश्नांबाबत कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. जिल्ह्यातील दूरध्वनी व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा त्रास जनतेला होत आहे.

       मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्यांविरोधात मनसेने जेवढ्या वेळा आवाज उठविला तेवढा कोणीही उठविलेला नाही. आजी -माजी लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे जनतेची मोठीच करमणूक होत आहे. याउलट मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन पुराव्यानिशी भाष्य करून जनतेचे डोळे उघडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जाहिराती फिक्या पडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांची पूर्णतः पोलखोल ते करीत आहेत. त्यांच्या सभाना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

          मच्छिमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. फक्त त्याबाबत घोषणा केल्या जातात. अमलबजावणी होत नाही. काही नेते म्हाडाची घरे देणार म्हणून सिंधुदुर्गात येऊन घोषणा करीत आहेत. मात्र, यापूर्वी देण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांची स्थिती काय आहे ? ते त्यांनी आधी पहावे.

       पालकमंत्री दीपक केसरकर, सत्ताधारी खासदार ,आमदार यांनी अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी  एक लाख सेटटॉप बॉक्स जिल्ह्यात वाटणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले? जिल्ह्यातील गावागावात इंटरनेट सेवा पोहचलेली नाही. मग डिजिटल इंडिया कसा होणार ? याचे उत्तर सत्ताधाऱ्यानी दिले पाहिजे. मात्र, ते तसे करणार नाहीत. त्यामुळे  भाजप नेत्यांसह सत्ताधाऱ्यांना  घरी बसविण्यासाठी मतदारांनी आता सज्ज व्हावे. असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग