शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा !--परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर  टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या  प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व

ठळक मुद्देमतदारांना आवाहन ; कणकवलीत पत्रकार परिषद

 

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर  टीका करताना फक्त चिखलफेक करीत आहेत. त्यांना जनतेच्या  प्रश्नांबाबत काहीच देणे घेणे नसून त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी व लोकप्रतिनिधींना मतदारांनी याबाबत जाब विचारावा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी .असे आवाहन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे  केले.

      कणकवली येथील संपर्क कार्यालतात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, प्रसाद गावडे, गुरुदास गवंडे, सचिन तावडे, विनोद सांडव, गणेश वाईरकर, फास्कल रॉड्रिक्स आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने चार बळी गेले आहेत. माकडतापाने डोके वर काढले आहे . त्याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधींना नाही. जनतेच्या प्रश्नांबाबत कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. जिल्ह्यातील दूरध्वनी व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा त्रास जनतेला होत आहे.

       मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्यांविरोधात मनसेने जेवढ्या वेळा आवाज उठविला तेवढा कोणीही उठविलेला नाही. आजी -माजी लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे जनतेची मोठीच करमणूक होत आहे. याउलट मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन पुराव्यानिशी भाष्य करून जनतेचे डोळे उघडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जाहिराती फिक्या पडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांची पूर्णतः पोलखोल ते करीत आहेत. त्यांच्या सभाना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

          मच्छिमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. फक्त त्याबाबत घोषणा केल्या जातात. अमलबजावणी होत नाही. काही नेते म्हाडाची घरे देणार म्हणून सिंधुदुर्गात येऊन घोषणा करीत आहेत. मात्र, यापूर्वी देण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांची स्थिती काय आहे ? ते त्यांनी आधी पहावे.

       पालकमंत्री दीपक केसरकर, सत्ताधारी खासदार ,आमदार यांनी अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी  एक लाख सेटटॉप बॉक्स जिल्ह्यात वाटणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले? जिल्ह्यातील गावागावात इंटरनेट सेवा पोहचलेली नाही. मग डिजिटल इंडिया कसा होणार ? याचे उत्तर सत्ताधाऱ्यानी दिले पाहिजे. मात्र, ते तसे करणार नाहीत. त्यामुळे  भाजप नेत्यांसह सत्ताधाऱ्यांना  घरी बसविण्यासाठी मतदारांनी आता सज्ज व्हावे. असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग