शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

असनिये धबधबा बनतोय पर्यटकांचे आकर्षण, गोव्यासह बांदा, सावंतवाडीवासीयांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:42 IST

हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्यावर गर्दी होत असून निसर्ग सहलीसाठी या ठिकाणाची निवड होत आहे.

ठळक मुद्देअसनिये धबधबा बनतोय पर्यटकांचे आकर्षण, गोव्यासह बांदा, सावंतवाडीवासीयांची पसंती स्थानिकांच्या हाताला मिळतोय रोजगार

संदेश कोलतेसावंतवाडी : हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्यावर गर्दी होत असून निसर्ग सहलीसाठी या ठिकाणाची निवड होत आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असनिये गाव निसर्ग सौंदर्यासाठी व वन्यजीवांच्या वस्तीसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीचे डोंगर, गर्द हिरवेगार जंगल, माड, पोकळीची झाडे, नैसर्गिक जलस्त्रोत, दारूबंदी यासाठी असनिये गाव प्रसिद्ध आहे. या सर्वात असनिये गावच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेल्या कणेवाडी धबधब्यामुळे गेली काही वर्षे असनिये गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.

असनियेहून घारपीचा प्रवास सुरू झाल्यावर कणेवाडी येथील घाटमार्गात समोर मनाला थक्क करणारा हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा धबधबा दृष्टीस पडतो. कोसळणारा पाऊस, धुक्याची झालर व दुसऱ्या बाजूने ताठ मानेने दौलत उभी असलेली सह्याद्रीची रांग सारे काही मनाला थक्क करून जाते. हा धबधबा सह्याद्री पर्वतरांगांच्या अवघड भागात असल्याने तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्याजवळ पोहोचणे आव्हानात्मक ठरते.गोवा, दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी तसेच आंबोली या शिवाय वर्षापर्यटनाची अन्य ठिकाणे शोधणारे पर्यटक या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. गावातील धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने गावातील ग्रामस्थांच्या हाताला हंगामी रोजगार मिळाला आहे. गावातील महिला बचत गटाच्यावतीने तसेच इतर ग्रामस्थांनी पर्यटकांच्या सोयीसाठी जेवण व नाश्त्याचे स्टॉल उभारले असून ग्रामस्थांच्या हाताला यातून हंगामी रोजगार मिळाला आहे.धबधब्याकडे असे जाधबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बांदामार्गे डेगवे-तांबोळी असा १३ किलोमीटरचा तर सावंतवाडी, ओटवणे तांबोळीमार्गे २२ किलोमीटरचा व दोडामार्ग तळकटमार्गे ३२ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. तेथून निमुळत्या पायवाटेने धबधब्याजवळ जाता येते. मात्र, हे सगळे अडथळे पार करून धबधब्याजवळ पोहोचल्यास पर्यटनाचा आनंद मिळतो. साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची पसंती या धबधब्याला मिळत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग