शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sindhudurg: गावपळणीसाठी शिराळे निर्मनुष्य!, दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:06 IST

गावकुसाबाहेर सडुरेत राहुट्यांची उभारणी : कडाक्याच्या थंडीतही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह

वैभववाडी : शिराळेवासियांनी गुरे-ढोरे, पाळीव प्राणी, पक्ष्यांसह बुधवारी (दि. ८) सायंकाळी गाव सोडला. त्यामुळे निर्मनुष्य झालेले गाव सुनेसुने झाले आहे. ‘वार्षिक गावपळण’ सुरू झाल्याने पुढचे चार-पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरेतील दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे. सध्या कडाक्याची थंडी असली, तरी पूर्वजांनी सुरू केलेल्या वार्षिकासाठी गाव सोडताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.साडेचारशे वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा आताही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या  या गावपळणीबद्दल अनेकांना कुतूहल आणि उत्सुकता आहे. एरव्ही शांत असणाऱ्या गर्द वनराईने नटलेला हा परिसर शिराळेवासीयांच्या आगमनाने गजबजून गेला आहे. गावकऱ्यांनी सोबत आणलेल्या गुरा-ढोरांचेही वास्तव्य तेथेच असणार आहे. शाळा, अंगणवाडीही येथेच भरते. त्यामुळे एरव्ही ‘चार भिंतींच्या आत’ शिकणाऱ्या चिमुकल्यांना उघड्यावर निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यासाचे धडे गिरवण्याचा आनंद लुटायला मिळतो.आठवडाभर पुरेल इतक्या शिदोरीचे गाठोडे डोक्यावर घेऊन गावकऱ्यांनी दुपारी ३ वाजल्यापासून राहुट्यांच्या दिशेने प्रवास सुरू केला. कुटुंबातील कर्ती माणसे पाळीव प्राणी, पक्षी घेऊन राहुट्यांच्या दिशेने निघाले. तर वयोवृद्ध, लहान मुले व महिलांनी साहित्य घेऊन ‘एसटी बस’ने वास्तव्याचे ठिकाण गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी आल्यामुळे राहुट्यांचा परिसर गजबजून गेला असून, एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, पुण्यातील गावकरी मंडळी होणार सामीलशिराळेच्या वार्षिक ‘गावपळण’ प्रथेबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र, सध्याच्या पिढीकडून गावपळणीबद्दल विविध मतप्रवाह ऐकायला मिळत असले, तरी या गावपळणीला आता उत्सवाचे रूप येऊ लागले असून, गावकरी मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी करतात. या काळात मुंबई, पुण्यासह विविध शहरांत गेलेली गावकरी मंडळीही या कालावधीत गावपळणीत सामील होत आहेत.

शिराळेच्या गावपळणीचे परराज्यातही कुतूहलशिराळेची वार्षिक गावपळण संपूर्ण राज्यासह लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गावपळणची पद्धत आणि रितीरिवाज पाहायला दरवर्षी विविध भागांतून लोक येत असतात. जिल्ह्यातील विविध संस्था, अभ्यासक याठिकाणी भेट देऊन ही प्रथा, परंपरा कशी सुरू झाली? त्यानंतर होत गेलेला बदल, आताच्या पिढीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदींचा मागोवा घेत असतात.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी