शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:19 IST

कुंडमळातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

ओरोस : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला असून, नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८१३ साकव असून त्यापैकी १६९ सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जे साकव नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी हा साकव नागरिकांनी वापरू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. खेबुडकर म्हणाले की, रविवारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील दुर्घटनेची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला. नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याचे तसेच नादुरुस्त साकवांचा वापर होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साकवांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वाचा - धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश १७५ साकव नव्याने  बांधले जाणारसद्य:स्थितीत जिल्ह्यात ८१३ साकव आहेत. यांपैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त आहेत.  १३८ साकव निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन साकव बांधले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आणखी १७५ साकव नव्याने बांधले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.नवीन साकवांसाठी ९७ कोटी आवश्यक४०६ नादुरुस्त साकव वगळून निर्लेखित झाकलेले नाही. नव्याने बांधण्यात येणाऱ्या साकवांसाठी तब्बल ९७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याशिवाय आणखी ३३७ ठिकाणी नव्याने साकव बांधण्याची मागणी प्रशासनाकडे आलेली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी दिली.‘त्या’ ठिकाणी फलक लावणारजिल्ह्यातील ४०६ साकव नादुरुस्त आहेत. यातील काही साकव अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे या नादुरुस्त साकवांच्या ठिकाणी नागरिकांनी साकवाचा वापर करू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याचेही  खेबुडकर यांनी सांगितले.