शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:19 IST

कुंडमळातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

ओरोस : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला असून, नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८१३ साकव असून त्यापैकी १६९ सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जे साकव नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी हा साकव नागरिकांनी वापरू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. खेबुडकर म्हणाले की, रविवारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील दुर्घटनेची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला. नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याचे तसेच नादुरुस्त साकवांचा वापर होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साकवांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वाचा - धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश १७५ साकव नव्याने  बांधले जाणारसद्य:स्थितीत जिल्ह्यात ८१३ साकव आहेत. यांपैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त आहेत.  १३८ साकव निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन साकव बांधले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आणखी १७५ साकव नव्याने बांधले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.नवीन साकवांसाठी ९७ कोटी आवश्यक४०६ नादुरुस्त साकव वगळून निर्लेखित झाकलेले नाही. नव्याने बांधण्यात येणाऱ्या साकवांसाठी तब्बल ९७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याशिवाय आणखी ३३७ ठिकाणी नव्याने साकव बांधण्याची मागणी प्रशासनाकडे आलेली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी दिली.‘त्या’ ठिकाणी फलक लावणारजिल्ह्यातील ४०६ साकव नादुरुस्त आहेत. यातील काही साकव अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे या नादुरुस्त साकवांच्या ठिकाणी नागरिकांनी साकवाचा वापर करू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याचेही  खेबुडकर यांनी सांगितले.