शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणासाठी समिती गठीत, मंत्रालयातील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:18 IST

अरुणा प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा सदस्यीय समिती मंत्रालयातील बैठकीत गठीत करण्यात आली. या समितीने येत्या सात दिवसांत पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

ठळक मुद्देअरुणासाठी समिती गठीत, मंत्रालयातील बैठकीत निर्णय ७ दिवसांत अहवाल देण्याची राज्यमंत्री बच्चू कडूंची सूचना

वैभववाडी : अरुणा प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा सदस्यीय समिती मंत्रालयातील बैठकीत गठीत करण्यात आली. या समितीने येत्या सात दिवसांत पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी राज्यमंत्री कडू यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव चेहल, कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक हमीद अन्सारी, मुख्य अभियंता एस. एस. तिरमनवार, माजी आमदार पुष्पसेन सांवत, प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, दीपक पांचाळ, प्रकाश मोरे, अजय नागप, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.अरुणा प्रकल्पग्रस्तांनी गेल्या आठवड्यात मंत्री कडू यांची भेट घेऊन अन्याय होत असल्याची कैफियत मांडली होती. त्याचवेळी कडू यांनी अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी राज्यमंत्री कडू यांच्या दालनात सभा झाली. या सभेत पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे झालेले काम, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीवर प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे यांनी आक्षेप घेतला.

प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी यांच्या माहितीत तफावत जाणवल्यामुळे राज्यमंत्री कडू यांनी प्रकल्प आणि पुनर्वसनाच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी समिती गठित करीत असल्याचे स्पष्ट केले.या समितीत जलसंपदा विभागाचे तीन, महसूल विभागाचे तीन अधिकारी आहेत तर उर्वरित सहा सदस्य हे प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी असणार आहेत. या समितीने प्रकल्प आणि पुनर्वसनाच्या सद्यस्थितीचा अहवाल पुढील सात दिवसांत द्यावा, अशी सूचना मंत्र्यांनी केली आहे...तर  त्या कामांचे चित्रीकरण करावेसमितीने पाहणी करण्याअगोदर पाटबंधारे विभागाला धरणाचे किंवा पुनर्वसनाचे काम करावयाचे असेल तर त्या कामांचे चित्रीकरण करण्यात यावे,अशी सूचनासुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना केली. पाहणी समितीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूsindhudurgसिंधुदुर्ग