शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वीज समस्या सोडवण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची होणार नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:59 IST

तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या  काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देफ्रन्चायझी पुरविण्याचा शासनाचा निर्णय बेरोजगारांना किमान दहा हजार रुपयांचे वेतन मिळावेमहिन्यास तीन हजार रुपयांचे मानधनही मिळणार

मालवण , दि. २७ :  तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या  काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अनुषंगाने वीजपुरवठ्या संदभार्तील विविध कामे करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ही त्याच गावातील विद्युततंत्रीचे शिक्षण घेतलेल्या युवकांची केली जाणार आहे. त्यांना प्रत्येक महिन्यास सुमारे तीन हजार रुपयांचे मानधनही मिळणार आहे.

ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेला विद्युत कर्मचारी हा काही गावांच्या समुहांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार संबंधित विद्युत कर्मचाऱ्याला त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या गावांमध्ये असलेले वीज वितरणाचे जाळे उपलब्ध आहे त्यामध्ये काही बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची झाल्यास तातडीने सुविधा उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे या सेवा ग्रामपंचायतीमार्फत तातडीने उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने तसेच गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात उद्भवणाऱ्या वीज पुरवठाविषयक समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येण काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रॅन्चायझी म्हणून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तीन हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत ही फ्रॅन्चायझी म्हणून काम करताना त्याचे कार्यक्षेत्र हे ग्रामपंचायतीतंर्गत महसूली गावाचे संपूर्ण क्षेत्र राहणार आहे. यात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांचा समावेश असणार आहे.

महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या  कामांपैकी मीटर रीडिंग घेणे, वीज देयके वाटणे, ब्रेकडाऊन अटेंड करून वीजपुरवठा पूर्ववत करणे, डी. ओ. फ्यूज टाकणे, फ्यूज कॉलच्या तक्रारी घेणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे ही कामे ग्रामपंचायतीने फ्रॅन्चायझी म्हणून करायची आहेत.

या कामांसाठी ग्रामपंचायतीमार्फत उपयुक्त व क्षमता धारण करणाऱ्या  व्यक्तींची एजन्सी म्हणून नेमणूक करून त्यांच्यामार्फत ही कामे करून घ्यायची आहेत. नेमणूक केलेल्या व्यक्तीला ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून ओळखले जाणार असून संबंधित व्यक्ती ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल याचे शिक्षण घेतलेली, मराठी भाषेचे ज्ञान तसेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून संबंधित गावातील व्यक्तीचीच निवड केली जाणार आहे. एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात इच्छुक व अर्हताधारण करणारी व्यक्ती न मिळाल्यास पाच किलोमीटर परिसरातील अन्य ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीची निवड केली जाणार आहे.

या ग्राम विद्युत व्यवस्थापकावर महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांचे तांत्रिक नियंत्रण तर प्रशासकीय नियंत्रण हे ग्रामपंचायतीचे असणार आहे. वीज पुरवठ्यासंदर्भातील कामांसाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाला प्रती ग्राहक ९ रुपये प्रमाणे मिळणारे उत्पन्न किंवा ३ हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती महावितरण कंपनीमार्फत दिली जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

किमान दहा हजार रुपये वेतन मिळावेशासनाच्या या निर्णयावर आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. गावातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र सद्य:स्थितीचा विचार करता तीन हजार रुपये मानधन हे फारच अत्यल्प आहे. त्यामुळे याचा विचार करून शासनाने किमान दहा हजार रुपयांचे मानधन दिल्यास त्याचा बेरोजगार तरुणांना लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत असा ठराव पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर यांनी मांडला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारkonkanकोकण