शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वीज समस्या सोडवण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची होणार नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:59 IST

तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या  काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देफ्रन्चायझी पुरविण्याचा शासनाचा निर्णय बेरोजगारांना किमान दहा हजार रुपयांचे वेतन मिळावेमहिन्यास तीन हजार रुपयांचे मानधनही मिळणार

मालवण , दि. २७ :  तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या  काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अनुषंगाने वीजपुरवठ्या संदभार्तील विविध कामे करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती ही त्याच गावातील विद्युततंत्रीचे शिक्षण घेतलेल्या युवकांची केली जाणार आहे. त्यांना प्रत्येक महिन्यास सुमारे तीन हजार रुपयांचे मानधनही मिळणार आहे.

ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेला विद्युत कर्मचारी हा काही गावांच्या समुहांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार संबंधित विद्युत कर्मचाऱ्याला त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या गावांमध्ये असलेले वीज वितरणाचे जाळे उपलब्ध आहे त्यामध्ये काही बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची झाल्यास तातडीने सुविधा उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे या सेवा ग्रामपंचायतीमार्फत तातडीने उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने तसेच गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात उद्भवणाऱ्या वीज पुरवठाविषयक समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येण काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रॅन्चायझी म्हणून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तीन हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत ही फ्रॅन्चायझी म्हणून काम करताना त्याचे कार्यक्षेत्र हे ग्रामपंचायतीतंर्गत महसूली गावाचे संपूर्ण क्षेत्र राहणार आहे. यात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहकांचा समावेश असणार आहे.

महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या  कामांपैकी मीटर रीडिंग घेणे, वीज देयके वाटणे, ब्रेकडाऊन अटेंड करून वीजपुरवठा पूर्ववत करणे, डी. ओ. फ्यूज टाकणे, फ्यूज कॉलच्या तक्रारी घेणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे ही कामे ग्रामपंचायतीने फ्रॅन्चायझी म्हणून करायची आहेत.

या कामांसाठी ग्रामपंचायतीमार्फत उपयुक्त व क्षमता धारण करणाऱ्या  व्यक्तींची एजन्सी म्हणून नेमणूक करून त्यांच्यामार्फत ही कामे करून घ्यायची आहेत. नेमणूक केलेल्या व्यक्तीला ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून ओळखले जाणार असून संबंधित व्यक्ती ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल याचे शिक्षण घेतलेली, मराठी भाषेचे ज्ञान तसेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून संबंधित गावातील व्यक्तीचीच निवड केली जाणार आहे. एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात इच्छुक व अर्हताधारण करणारी व्यक्ती न मिळाल्यास पाच किलोमीटर परिसरातील अन्य ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तीची निवड केली जाणार आहे.

या ग्राम विद्युत व्यवस्थापकावर महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांचे तांत्रिक नियंत्रण तर प्रशासकीय नियंत्रण हे ग्रामपंचायतीचे असणार आहे. वीज पुरवठ्यासंदर्भातील कामांसाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाला प्रती ग्राहक ९ रुपये प्रमाणे मिळणारे उत्पन्न किंवा ३ हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती महावितरण कंपनीमार्फत दिली जाणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

किमान दहा हजार रुपये वेतन मिळावेशासनाच्या या निर्णयावर आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. गावातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र सद्य:स्थितीचा विचार करता तीन हजार रुपये मानधन हे फारच अत्यल्प आहे. त्यामुळे याचा विचार करून शासनाने किमान दहा हजार रुपयांचे मानधन दिल्यास त्याचा बेरोजगार तरुणांना लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत असा ठराव पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर यांनी मांडला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारkonkanकोकण