शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ अफवाच!, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 30, 2022 17:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख, काळा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे.

कणकवली : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींच्या भूमिका दोन महिन्यात कशा बदलल्या, हे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या नागरिकांना कळून चुकले आहे. शिवसेना आणि काँगेसचे सरकार असताना सत्ताधारी आमदार घोषणा करत होते. पण त्या अफवाच होत्या. तेव्हा विरोधात असलेल्यांनीही केलेल्या घोषणा याही अशाच अफवा होत्या अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.तर, याबाबत मनसे लोकांना जागरूक करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये कधी येणार आणि परदेशातल्या काळ्या पैशासोबत जनतेचा लुटलेला पांढरा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे असेही उपरकर म्हणाले. कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री उपस्थित होते.उपरकर म्हणाले, कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कोट्यावधी रुपयांच्या योजना मतदारसंघात आणल्याचे सांगितले. परंतु त्या योजना प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत. ३४ ते ३५ किलोमीटरची आठ कोटीची मातोश्री पांदण योजना मतदार संघात आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध बंधारे, विकास कामांच्या घोषणाही त्यांनी केल्या. परंतु त्या एकाही कामाचा शुभारंभ झाला नाही. मग अधिकाऱ्यांच्या विरोधात जाणे, त्यांना बोलणे ही भूमिका आता त्यांनी घेतली आहे.

..पण सर्वसामान्यांची कर्जमाफी करायला जमलं नाहीतर आता सत्तेत आलेले भाजपाचे आमदार नितेश राणे हे  प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रिंटर देणार, संगणक देणार, रस्त्यांना निधी देणार अशा प्रकारच्या घोषणा करत आहेत. त्या तसेच पूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले? मुंबई – गोवा महामार्गाच्या दुर्दशेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मोठमोठ्या उद्योजकांना कर्जमाफी केली जात आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांना कर्जमाफी करायला केंद्र आणि राज्य सरकारला जमलेले नाही.

स्थानिकांवर अन्यायपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करत असताना परप्रांतीयांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणत स्थानिकांवर अन्याय करत आहेत. मनसेने परप्रांतीच्या विरोधात पूर्वी पासूनच आंदोलनात्मक भूमिका घेतली  आहे. जे परप्रांतीय पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव करत आहेत त्यांना आम्ही महाराष्ट्रीयन समजतो. मात्र एक ते दोन वर्षासाठी येणाऱ्या लोकांचा मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा देऊन जिल्ह्यातल्या कारागिरांच्या पोटावर पाय देण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे असे उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे