शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ अफवाच!, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 30, 2022 17:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख, काळा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे.

कणकवली : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींच्या भूमिका दोन महिन्यात कशा बदलल्या, हे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या नागरिकांना कळून चुकले आहे. शिवसेना आणि काँगेसचे सरकार असताना सत्ताधारी आमदार घोषणा करत होते. पण त्या अफवाच होत्या. तेव्हा विरोधात असलेल्यांनीही केलेल्या घोषणा याही अशाच अफवा होत्या अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.तर, याबाबत मनसे लोकांना जागरूक करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये कधी येणार आणि परदेशातल्या काळ्या पैशासोबत जनतेचा लुटलेला पांढरा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे असेही उपरकर म्हणाले. कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री उपस्थित होते.उपरकर म्हणाले, कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कोट्यावधी रुपयांच्या योजना मतदारसंघात आणल्याचे सांगितले. परंतु त्या योजना प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत. ३४ ते ३५ किलोमीटरची आठ कोटीची मातोश्री पांदण योजना मतदार संघात आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध बंधारे, विकास कामांच्या घोषणाही त्यांनी केल्या. परंतु त्या एकाही कामाचा शुभारंभ झाला नाही. मग अधिकाऱ्यांच्या विरोधात जाणे, त्यांना बोलणे ही भूमिका आता त्यांनी घेतली आहे.

..पण सर्वसामान्यांची कर्जमाफी करायला जमलं नाहीतर आता सत्तेत आलेले भाजपाचे आमदार नितेश राणे हे  प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रिंटर देणार, संगणक देणार, रस्त्यांना निधी देणार अशा प्रकारच्या घोषणा करत आहेत. त्या तसेच पूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले? मुंबई – गोवा महामार्गाच्या दुर्दशेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मोठमोठ्या उद्योजकांना कर्जमाफी केली जात आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांना कर्जमाफी करायला केंद्र आणि राज्य सरकारला जमलेले नाही.

स्थानिकांवर अन्यायपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करत असताना परप्रांतीयांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणत स्थानिकांवर अन्याय करत आहेत. मनसेने परप्रांतीच्या विरोधात पूर्वी पासूनच आंदोलनात्मक भूमिका घेतली  आहे. जे परप्रांतीय पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव करत आहेत त्यांना आम्ही महाराष्ट्रीयन समजतो. मात्र एक ते दोन वर्षासाठी येणाऱ्या लोकांचा मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा देऊन जिल्ह्यातल्या कारागिरांच्या पोटावर पाय देण्याचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे असे उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे