शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

अण्णा हजारेंनी भाजप सरकारकडे अधिक पत्रव्यवहार केला, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 19:18 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही.

सावंतवाडी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही. त्यामुळेच आता गावागावात अण्णा हजारे निर्माण होऊन आंदोलने करावीत. या आंदोलनांना आमचे सहकार्य राहिल असे मत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे निरिक्षक तथा विश्वस्त अलाऊद्दीन शेख यांनी मांडले. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.शेख म्हणाले, अण्णा हजारे यांनी देशात अनेक आंदोलने केली पण रामलीला मैदानावर झालेले आंदोलन चांगलेच जगभरात गाजले होते. तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात संस्था, पक्ष यांनी पाठींबा दिला. देशातील मिडिया ने ही हे आंदोलन उचलून धरले. पण नंतर भाजप प्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर अण्णांनी काही वर्षे नव्या सरकार ला काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच आंदोलन केले नाही पण तीन वर्षानंतर कडक भूमिका घेण्यात आली तेव्हा राज्यातील तेव्हाचे भाजप नेते राळेगणसिद्धीत येत असत आणि ते आंदोलन मिटविण्यात येई आम्ही प्रत्येकाला काम करण्याची संधी देत असल्याचे शेख यांनी सागितले.काँग्रेस काळात अण्णा हजारे यांनी केंद्रात पत्रव्यवहार केला की त्याला चांगला प्रतिसाद मिळत असे पण आता भाजप सरकारच्या काळात तसा प्रतिसाद मिळत नाही. पंतप्रधान अण्णाच्या पत्राची दखल घेत नाहीत हे अण्णांनी अनेक वेळा नमूद केले आहे. पण अण्णा गप्प बसणार नाहीत. अनेक भ्रष्टाचारा बाबत पत्रव्यवहार करत राहातील असे शेख यानी सांगितले. पण पुन्हा अण्णा आंदोलन करणार का यावर आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पण आता अण्णांचे वय झाले असून ते नेहमीच मार्गदर्शन करतील गावा गावातून अण्णा निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकरणाचा आढावा घेऊन ती सर्व प्रकरणे अण्णा कडे देण्यात येतील असे सांगितले.या पत्रकार परिषदेस न्यासाचे जिल्हाध्यक्ष जयत बरेगार, अॅड. संदिप निंबाळकर, अॅड आर्या सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गanna hazareअण्णा हजारे