शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

अण्णा हजारेंनी भाजप सरकारकडे अधिक पत्रव्यवहार केला, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 19:18 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही.

सावंतवाडी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात जेवढे पत्रव्यवहार केले नाहीत, त्यापेक्षा अधिक पत्रव्यवहार हे भाजप सरकारकडे केले. पण या सरकारमध्ये संवेदनशीलता दिसली नाही. त्यामुळेच आता गावागावात अण्णा हजारे निर्माण होऊन आंदोलने करावीत. या आंदोलनांना आमचे सहकार्य राहिल असे मत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे निरिक्षक तथा विश्वस्त अलाऊद्दीन शेख यांनी मांडले. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.शेख म्हणाले, अण्णा हजारे यांनी देशात अनेक आंदोलने केली पण रामलीला मैदानावर झालेले आंदोलन चांगलेच जगभरात गाजले होते. तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात संस्था, पक्ष यांनी पाठींबा दिला. देशातील मिडिया ने ही हे आंदोलन उचलून धरले. पण नंतर भाजप प्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर अण्णांनी काही वर्षे नव्या सरकार ला काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच आंदोलन केले नाही पण तीन वर्षानंतर कडक भूमिका घेण्यात आली तेव्हा राज्यातील तेव्हाचे भाजप नेते राळेगणसिद्धीत येत असत आणि ते आंदोलन मिटविण्यात येई आम्ही प्रत्येकाला काम करण्याची संधी देत असल्याचे शेख यांनी सागितले.काँग्रेस काळात अण्णा हजारे यांनी केंद्रात पत्रव्यवहार केला की त्याला चांगला प्रतिसाद मिळत असे पण आता भाजप सरकारच्या काळात तसा प्रतिसाद मिळत नाही. पंतप्रधान अण्णाच्या पत्राची दखल घेत नाहीत हे अण्णांनी अनेक वेळा नमूद केले आहे. पण अण्णा गप्प बसणार नाहीत. अनेक भ्रष्टाचारा बाबत पत्रव्यवहार करत राहातील असे शेख यानी सांगितले. पण पुन्हा अण्णा आंदोलन करणार का यावर आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पण आता अण्णांचे वय झाले असून ते नेहमीच मार्गदर्शन करतील गावा गावातून अण्णा निर्माण झाले पाहिजेत अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकरणाचा आढावा घेऊन ती सर्व प्रकरणे अण्णा कडे देण्यात येतील असे सांगितले.या पत्रकार परिषदेस न्यासाचे जिल्हाध्यक्ष जयत बरेगार, अॅड. संदिप निंबाळकर, अॅड आर्या सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गanna hazareअण्णा हजारे