शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबध्द आराखडा कृषि विभागाने तयार करावा : दीपक केसरकर

By admin | Updated: April 20, 2017 17:16 IST

जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २० : जिल्ह्यातील शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा, प्रती वर्षी किमान खरीप, रब्बी हंगामासह तीन पिके घ्यावीत या अनुषंगाने कृषि विभागाने शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबध्द आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत केली.येथील जिल्हा नियोजन समितीच्या (जुन्या) सभागृहात आयोजित या खरीप हंगाम आढावा जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हात्रे व कृषी विभागाचे अधिकारी तसेच खाते प्रमुख उपस्थित होते.सुधारित पध्दतीच्या भात जातीच्या लागवडीस प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक गावात माहिती देणारे बॅनर्स लावावेत अशी सूचना करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, कृषि विभागाने जिल्ह्यात गाव-निहाय किती विहीरी उपलब्ध आहेत, किती विहिरीवर पंप आहेत, याची माहिती संकलित करावी, पाण्याची साठवण वाढावी, शेतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी किती वळण बंधा-यांची गरज आहे. तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांची किती गरज आहे, याचेही सर्वेक्षण करुन अद्यावत माहिती संकलीत करावी. उपलब्ध पाण्याचा पुरेपुर वापर होण्याबरोबरच वर्षभरात किमान तीन पिके शेतक-यांनी घ्यावीत. यासाठी कृषि विभागाने प्रयत्नशील रहावे, असे यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सौर उर्जेवर कृषि पंप जोडण्या देण्यासाठी महावितरण कंपनीने तीनशे शेतकरी होतील यासाठी प्रयत्न करावेत, कृषि विभागाने पंधरा दिवसात शेती यांत्रिकीकरण, पाणीसाठा वाढविण्याबाबत सविस्तर आराखडा घ्यावा. खरीप भात शेतीच्या प्रमाणात रब्बी हंगामात केवळ ५ टक्के भात शेती होते. हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. उन्हाळी भात शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषि विभागाने सर्वेक्षण करावे. आदी सूचना यावेळी केल्या.खरीपसाठी ६७ हजार ७५० हेक्टर लक्षांकयंदाच्या खरीप हंगामासाठी ६७ हजार ७५० हेक्टर क्षेत्राचा लक्षांक निधार्रीत केला आहे. यामध्ये भात ६३ हजार हेक्टर, नागली २ हजार हेक्टर, इतर तृणधान्ये २०० हेक्टर, कडधान्ये २ हजार हेक्टर तर तेलबिया ५५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेते १८१ आहेत. खत विक्रेते २४८ यापैकी सहकारी २४८ यापैकी सहकारी संघ व सोसायट्या ११८ आहेत. किटक नाशके विक्रेते १३७ आहेत. खरीप हंगाम २०१७ साठी २२ हजार १७५ मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. तर ७ हजार ५३१ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. सुधारीत व संकलित भात बियाणे यंदाच्?या हंगामात ७ हजार ५३१ क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन केले आहे. रासायनिक २२ हजार १७५ मेट्रीक टनाची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. ४३४६ शेतक-यांना आंबा नुकसान भरपाई वितरणजिल्ह्यातील ४ हजार ३४६ आंबा उत्पादक शेतकरी तर ११७ काजू उत्पादक शेतक-यांना अनुक्रमे १३५८.११ लक्ष व ९.४० लक्ष नुकसान भरपाई वितरीत केली आहे. हवामानावर आधारीत पथदर्षी फळ पिक विमा योजना अंतर्गत २०१६-१७ मध्ये आंबा ५७११ शेतकरी, काजू १२८ तर केळी ११ शेतकरी सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने आंबा २८८ लक्ष, काजू ४२.९६ लक्ष तर केळी ४६ हजार रुपये विमा हप्?ता रक्?कम भरलेली आहे.२१ एप्रिल २०१७ रोजी संपन्न झालेल्या खरीप सन २०१६-१७ जिल्हास्तरीय आढावा सभेतील उपस्थित मुद्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची माहिती या सभेत देण्यात आली. यामध्ये श्री पध्दतीने भात लागवडीची ८८० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके गत खरीप हंगामात घेण्यात आली तसेच चतुसुत्री ८०० हेक्?टर व सगुणा भात उत्पादन तंत्रज्ञान ८० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. कृषि अभियांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत ३३१.८८ लक्ष रुपये निधी खर्च झाला. उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी एन. बी. २१ या गवताच्या वाणाचे ३ हजार ठोबांचे वाटप केले आहे. हिरव्या चा-यासाठी शंभर टक्के अनुदानावर ६१ हजार ५६० किलो बियाणाचे वितरण करण्यात आले. अनामत रक्कम भरलेल्?या १हजार ८७८ कृषि पंपापैकी ८७१ कृषि पंपाना विज जोडणीचे काम पूर्ण केले. जिल्हा स्तरापासून विविध विकास कार्यकारी सेवा सोसायट्यांपर्यंत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार २ हजार ८०० ऐवढे नविन सभासद होऊन त्यांनी ९८३.२० लक्ष रुपयांच्या कजार्ची उचल केली आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरीता जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. ३७४ कामांसाठी १६४६.६९ लाखाचा आराखडा तयार केला असून मार्च २०१७ अखेर ३८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ३१६.५१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.प्रारंभी अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन २०१६-१७ मध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या कृषि कर्मचा-यांचा यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाबली सहदेव गाड, अशोक पारकर, सुधाकर कारवडे, विवेकानंद नाईक व दिगंबर राणे यांचा सत्कार करण्यात आला.