शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

'अग्निपथ' मधून बेकारांची फौज तयार होईल!, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:51 IST

युद्धाच्या मैदानात लढण्यासाठी जी प्रेरणा कौशल्य, संघर्ष, शक्ती लागते ती चार वर्षात तयार होवू शकत नाही.

कणकवली : सैन्यदलात १५ वर्षे सेवा बजावून ३३ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाला दहा - दहा वर्षे नोकरीसाठी वणवण करावी लागते. नव्या ' अग्निपथ ' योजनेत चार वर्षात सैनिकांना सेवानिवृत्त केल्यास बेकारांची फौज उभी राहील. सैन्यात अर्धवट नोकरी केलेल्या या मुलांमध्ये प्रचंड नैराश्य येईल आणि ते धोकादायक असणार आहे असे मत माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सावंत म्हणाले, युद्धाच्या मैदानात लढण्यासाठी जी प्रेरणा कौशल्य, संघर्ष, शक्ती लागते ती चार वर्षात तयार होवू शकत नाही. याचा सैन्य दलावर मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजनेचा पुनर्विचार करायला हवा. याबाबत सैनिक फेडरेशनतर्फे ठराव घेऊन पंतप्रधानांना पत्र पाठविले जाणार आहे. त्याची दखल न घेतल्यास आंदोलनाशिवाय आमच्या जवळ दुसरा पर्याय राहणार नाही.'अग्निपथ' मागे राजकीय षड्यंत्र'अग्निपथ ' हा एक नवीन प्रयोग सुरू झाला आहे . याच्या पाठीमागे राजकीय षड्यंत्र काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे . सैन्यात शिपाई झाल्यानंतर त्यांचे दुधाचे दात पडण्यासाठी ४ वर्ष लागतात. मग तो कुठेतरी योद्धा होतो आणि ७-८ वर्षामध्ये युद्ध कौशल्यात पारंगत होतो. सैन्य म्हणजे काही नोकरी धंद्याचे ठिकाण नव्हे आणि सरकारने सुद्धा सैन्याला नोकरी देण्याचे ठिकाण बनवू नये . कुठलाही सैनिक पैशासाठी लढत नाही, तो मातृभूमीसाठी लढतो. त्याला राष्ट्रप्रेमी सैनिक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते. त्याला एक काळ लागतो. वर्षांमध्ये कुणीही पूर्ण सैनिक बनू शकत नाही...मग सैनिकांना निर्दयीपणे का वागवले जाते?१५ वर्ष सैन्यात वापरून घेतात आणि नंतर त्यांना रस्त्यावर फेकून देतात. मग निवृत्त सैनिक नोकरीसाठी दरदर भटकतो. त्यामुळे निवृत्त सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इतर सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी आहे. मग सैनिकांना असे निर्दयीपणे का वागवले जाते. शासकीय नोकरीत घेण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्यांना पहिली तीन वर्षे सैन्य दलात नोकरी करण्याची सक्ती करावी. जेणेकरून सरकारी नोकरीत फौज तयार होईल, कामात शिस्त येईल , अशी मागणी आपण यापूर्वीच केल्याचे सावंत म्हणाले.पेन्शन कमी करण्यासाठी 'अग्निपथ'चा अट्टहाससैन्याची पुर्नरचना करताना सैन्य कमकुवत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ४ वर्षे सैन्यात घेऊन, नंतर त्यांना काढून टाकणे चुकीचे आहे. सैन्याला वाचवा म्हणून आपल्याला दररोज मेसेज येत आहेत. केवळ पेन्शन कमी करण्यासाठी अग्निपथ'चा अट्टहास नको , असेही सुधीर सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAgneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवान