शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 17:14 IST

सावडाव मारहाण प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार 

कणकवली : सन २०१४ पूर्वी दहशत, अपहरण, मारामारी, खून यासारख्या अनेक घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात बदनामी झाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत होती. निवडणूकांमध्ये राज्यात एकमेव संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा म्हणून ओळख होती. हे पाप नारायण राणे आणि त्याच्या लोकांचे होते. सुदैवाने राणेंचा २०१४ मध्ये पराभव झाला, त्यानंतर  २०१४ ते २०२४ पर्यतच्या गेल्या १० वर्षात एक सुसंस्कृत जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राणेंची परत सत्ता आली आहे. त्यामुळे २०१४ पूर्वी सारख्या हत्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या घटना होवू लागल्या आहेत. त्याला नारायण राणे व त्यांची मुलेच जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतिश सावंत, महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मज्जिद बटवाले, तात्या निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले, बिडवलकर खून आणि त्यानंतर सावडाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला अमानुष व क्रुरपणे मारहाण झाली आहे. त्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला. बिडवलकर खूनाची उकल करुन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपींचा व्हिडिओ वैभव नाईक यांनी व्हायरल केला आहे. त्यात आरोपी बिनधास्तपणे बोलताना दिसत आहे. त्याला कोणाचीच भिती दिसत नाही. त्याने मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केलेली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीची दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपारीची नोटीस प्रांताधिकारी कार्यालयात पडलेली आहे. त्या फाईलचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. अशी आमची मागणी आहे.  सावडाव येथील वैभव सावंत यांच्या कुटुंबियांना आम्ही भेटून आलो. त्यांच्याकडील फाईल्स पाहिल्या तर त्यांच्या गावात चांगल्या प्रकारे कामे झाली पाहिजेत, गावासाठी आलेल्या विकास निधीचा चांगला वापर झाला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. मात्र, त्या सावंत कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण झाली.  यासंदर्भात पुन्हा पोलिस अधिक्षकांना आम्ही भेटणार आहोत. या मारहाण प्रकरणी  योग्य ती कारवाई झालेली नाही. कारण या प्रकरणातील आरोपीचे पालकमंत्री आश्रयदाते असल्याने त्यांच्यावर फक्त ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पालकमंत्री, खासदार पाठींबा देत असतील, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे.सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतातसावडाव मधील मारहाण प्रकरणात ५ आरोपी आहेत,त्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बनावटीच्या दोन बंदुका आहेत.  त्यामुळे सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतात. यापुढे गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल.त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज  चिपी विमान सेवा बंद आहे, केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे यांना त्याची आठवण देखील नसेल. भाजपाची सत्ता दिल्ली ते गल्ली पर्यंत आहे. मात्र, ते स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना निधी तसेच इतर गोष्टीचे आमिष दाखवून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शेवटपर्यंत अन्यायाविरोधात लढत राहणार आहोत. नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करुआपल्या पक्षात नसलेल्यांना निधी न देण्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. त्यापुढे जावून न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. मंत्री उदय सामंत यांना मी जास्त किंमत देत नाही. रत्नागिरीत आम्ही जोरदार मोहिम आखल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता सिंधुदुर्गात यायला लागले आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत