शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 17:14 IST

सावडाव मारहाण प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार 

कणकवली : सन २०१४ पूर्वी दहशत, अपहरण, मारामारी, खून यासारख्या अनेक घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात बदनामी झाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत होती. निवडणूकांमध्ये राज्यात एकमेव संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा म्हणून ओळख होती. हे पाप नारायण राणे आणि त्याच्या लोकांचे होते. सुदैवाने राणेंचा २०१४ मध्ये पराभव झाला, त्यानंतर  २०१४ ते २०२४ पर्यतच्या गेल्या १० वर्षात एक सुसंस्कृत जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राणेंची परत सत्ता आली आहे. त्यामुळे २०१४ पूर्वी सारख्या हत्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या घटना होवू लागल्या आहेत. त्याला नारायण राणे व त्यांची मुलेच जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतिश सावंत, महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मज्जिद बटवाले, तात्या निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले, बिडवलकर खून आणि त्यानंतर सावडाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला अमानुष व क्रुरपणे मारहाण झाली आहे. त्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला. बिडवलकर खूनाची उकल करुन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपींचा व्हिडिओ वैभव नाईक यांनी व्हायरल केला आहे. त्यात आरोपी बिनधास्तपणे बोलताना दिसत आहे. त्याला कोणाचीच भिती दिसत नाही. त्याने मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केलेली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीची दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपारीची नोटीस प्रांताधिकारी कार्यालयात पडलेली आहे. त्या फाईलचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. अशी आमची मागणी आहे.  सावडाव येथील वैभव सावंत यांच्या कुटुंबियांना आम्ही भेटून आलो. त्यांच्याकडील फाईल्स पाहिल्या तर त्यांच्या गावात चांगल्या प्रकारे कामे झाली पाहिजेत, गावासाठी आलेल्या विकास निधीचा चांगला वापर झाला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. मात्र, त्या सावंत कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण झाली.  यासंदर्भात पुन्हा पोलिस अधिक्षकांना आम्ही भेटणार आहोत. या मारहाण प्रकरणी  योग्य ती कारवाई झालेली नाही. कारण या प्रकरणातील आरोपीचे पालकमंत्री आश्रयदाते असल्याने त्यांच्यावर फक्त ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पालकमंत्री, खासदार पाठींबा देत असतील, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे.सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतातसावडाव मधील मारहाण प्रकरणात ५ आरोपी आहेत,त्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बनावटीच्या दोन बंदुका आहेत.  त्यामुळे सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतात. यापुढे गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल.त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज  चिपी विमान सेवा बंद आहे, केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे यांना त्याची आठवण देखील नसेल. भाजपाची सत्ता दिल्ली ते गल्ली पर्यंत आहे. मात्र, ते स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना निधी तसेच इतर गोष्टीचे आमिष दाखवून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शेवटपर्यंत अन्यायाविरोधात लढत राहणार आहोत. नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करुआपल्या पक्षात नसलेल्यांना निधी न देण्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. त्यापुढे जावून न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. मंत्री उदय सामंत यांना मी जास्त किंमत देत नाही. रत्नागिरीत आम्ही जोरदार मोहिम आखल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता सिंधुदुर्गात यायला लागले आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत