शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; भारतीय संघाचा T20I मधील घरच्या मैदानातील सर्वात मोठा पराभव
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
5
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
6
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
7
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
8
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
9
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
10
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
11
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
12
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
13
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
14
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
15
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
16
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
17
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
18
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
19
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
20
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 17:14 IST

सावडाव मारहाण प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार 

कणकवली : सन २०१४ पूर्वी दहशत, अपहरण, मारामारी, खून यासारख्या अनेक घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात बदनामी झाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत होती. निवडणूकांमध्ये राज्यात एकमेव संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा म्हणून ओळख होती. हे पाप नारायण राणे आणि त्याच्या लोकांचे होते. सुदैवाने राणेंचा २०१४ मध्ये पराभव झाला, त्यानंतर  २०१४ ते २०२४ पर्यतच्या गेल्या १० वर्षात एक सुसंस्कृत जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राणेंची परत सत्ता आली आहे. त्यामुळे २०१४ पूर्वी सारख्या हत्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या घटना होवू लागल्या आहेत. त्याला नारायण राणे व त्यांची मुलेच जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतिश सावंत, महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मज्जिद बटवाले, तात्या निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले, बिडवलकर खून आणि त्यानंतर सावडाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला अमानुष व क्रुरपणे मारहाण झाली आहे. त्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला. बिडवलकर खूनाची उकल करुन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपींचा व्हिडिओ वैभव नाईक यांनी व्हायरल केला आहे. त्यात आरोपी बिनधास्तपणे बोलताना दिसत आहे. त्याला कोणाचीच भिती दिसत नाही. त्याने मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केलेली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीची दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपारीची नोटीस प्रांताधिकारी कार्यालयात पडलेली आहे. त्या फाईलचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. अशी आमची मागणी आहे.  सावडाव येथील वैभव सावंत यांच्या कुटुंबियांना आम्ही भेटून आलो. त्यांच्याकडील फाईल्स पाहिल्या तर त्यांच्या गावात चांगल्या प्रकारे कामे झाली पाहिजेत, गावासाठी आलेल्या विकास निधीचा चांगला वापर झाला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. मात्र, त्या सावंत कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण झाली.  यासंदर्भात पुन्हा पोलिस अधिक्षकांना आम्ही भेटणार आहोत. या मारहाण प्रकरणी  योग्य ती कारवाई झालेली नाही. कारण या प्रकरणातील आरोपीचे पालकमंत्री आश्रयदाते असल्याने त्यांच्यावर फक्त ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पालकमंत्री, खासदार पाठींबा देत असतील, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे.सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतातसावडाव मधील मारहाण प्रकरणात ५ आरोपी आहेत,त्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बनावटीच्या दोन बंदुका आहेत.  त्यामुळे सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतात. यापुढे गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल.त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज  चिपी विमान सेवा बंद आहे, केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे यांना त्याची आठवण देखील नसेल. भाजपाची सत्ता दिल्ली ते गल्ली पर्यंत आहे. मात्र, ते स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना निधी तसेच इतर गोष्टीचे आमिष दाखवून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शेवटपर्यंत अन्यायाविरोधात लढत राहणार आहोत. नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करुआपल्या पक्षात नसलेल्यांना निधी न देण्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. त्यापुढे जावून न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. मंत्री उदय सामंत यांना मी जास्त किंमत देत नाही. रत्नागिरीत आम्ही जोरदार मोहिम आखल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता सिंधुदुर्गात यायला लागले आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत