शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:30 IST

Rajan Teli Kankavli Sindhdurug- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, राज्य सरकारने जिल्हा बँकेची मुदत संपल्यावर आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ दिली आहे . या मुदतवाढिच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ७० टक्केहून अधिक ठराव झालेले असताना विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत . जिल्हा बँक निवडणुकीत स्वतःला मतदान होण्यासाठी मतदारांच्या शँभरहून अधिक नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे .निवडणूक आयुक्तांकडे याबाबत आम्ही तक्रार केली असून त्यांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे . काही वृत्तपत्रात दिलेल्या नोटीस नुसार उर्वरित नवीन ठराव देण्यासाठी १८ ते २२ जानेवारी २०२१ हा फक्त ५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे . यातून राज्य सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका राजन तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदानाचे अधिकार असलेले ४५७ ठराव येणे अजूनही बाकी आहे . कोव्हीडमुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेल्या प्रक्रियेपासून गृहीत धरण्यात आला आहे . याविरोधात उच्च न्यायालयात भाजपा दाद मागणार आहे .कोरोनाचे कारण पुढे करीत सत्ताधारी राजकारण करत आहेत . जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होणे गरजेचे आहे . त्यामुळे न्यायासाठी आम्ही आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही राजन तेली यावेळी म्हणाले . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली