शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर :राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:30 IST

Rajan Teli Kankavli Sindhdurug- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर राजन तेली यांची टीका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीसीमध्ये पूर्वीचे मतदार ठराव कायम राहतील अशी सूचना केली आहे . याला आमचा आक्षेप आहे. ते ठराव ज्यावेळी घेतले त्यावेळची आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आवश्यकता भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, राज्य सरकारने जिल्हा बँकेची मुदत संपल्यावर आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ दिली आहे . या मुदतवाढिच्या काळातच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ७० टक्केहून अधिक ठराव झालेले असताना विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवली आहेत . जिल्हा बँक निवडणुकीत स्वतःला मतदान होण्यासाठी मतदारांच्या शँभरहून अधिक नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी दिली आहे .निवडणूक आयुक्तांकडे याबाबत आम्ही तक्रार केली असून त्यांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे . काही वृत्तपत्रात दिलेल्या नोटीस नुसार उर्वरित नवीन ठराव देण्यासाठी १८ ते २२ जानेवारी २०२१ हा फक्त ५ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे . यातून राज्य सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका राजन तेली यांनी केली.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदानाचे अधिकार असलेले ४५७ ठराव येणे अजूनही बाकी आहे . कोव्हीडमुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेल्या प्रक्रियेपासून गृहीत धरण्यात आला आहे . याविरोधात उच्च न्यायालयात भाजपा दाद मागणार आहे .कोरोनाचे कारण पुढे करीत सत्ताधारी राजकारण करत आहेत . जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होणे गरजेचे आहे . त्यामुळे न्यायासाठी आम्ही आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही राजन तेली यावेळी म्हणाले . 

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली