शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सावधान, सह्याद्रीचा बुरूज ढासळतोय; नाटळ गावातील पूर्वेकडचा काही भाग कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:45 IST

मिलिंद डोंगरे कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने ...

मिलिंद डोंगरेकनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने येथील नजीक असलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे झालेल्या घटनेच्या स्मरणाने पुन्हा एकदा प्रत्येकाच्या हृदयात धडकी भरली आहे.

नाटळ गावाला तिन्ही बाजूला डोंगररांगांचे एक प्रकारचे संरक्षणच लाभले आहे. परंतु हेच संरक्षण जेव्हा काळ बनून समोर उभे ठाकते तेव्हा मात्र हृदयाचे पाणी पाणी होते. गावाच्या पूर्वेला मोठा डोंगर पसरला आहे. गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर बॉर्डर सुरू होते. या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा धरणाचे पाणी पसरले आहे. या धरणाचे पाणी कित्येक वर्षे या डोंगर भागात मुरत आहे.

डोंगराचे भूस्खलन होण्याचा धोकाउन्हाळ्यातही या डोंगर भागात पाणी असते. दिवसेंदिवस पाणी मुरण्याची क्षमता वाढत असल्याने या डोंगरांचे भूस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. यावर वेळीच उपाययोजना शासनस्तरावर होणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखा प्रसंग घडायला वेळ लागणार नाही.

२५ ते ३० मीटर रुंदीचा भाग कोसळलायावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून फळसाचा माळ या ठिकाणचा डोंगर कोसळला. कोसळलेला भाग खाली राहत असलेले नामदेव सावंत व त्यांचे भाऊ यांच्या घरांपासून एकदम जवळच आहे. मध्ये नदी असल्याने कोसळलेल्या भागाची माती, दगड हे थेट नदीपात्रात आले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सुमारे २५ ते ३० मीटर एवढ्या रुंदीचा भाग व अडीचशे ते ३०० मीटर एवढ्या उंचीचा भाग खाली कोसळला आहे.

शासनस्तरावर उपाययोजनांची गरजकाही वर्षांपूर्वी या डोंगर भागात बहुतांश वेळा छोटे-छोटे भूस्खलन झालेले आहे. निसर्गानेही एक आपल्या रौद्र रुपाची झलक दाखवली आहे. भविष्यात होणाऱ्या अशा नैसर्गिक संकटांपासून येथील ग्रामस्थांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

ग्रामस्थांना नोटिसा, विमा उतरविण्याचे आवाहनदोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळून दुर्घटना घडली होती. यात एक घर जमिनीखाली गाडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक जण जायबंदी झाला होता. याची दखल घेत शासनाच्यावतीने सह्याद्री पट्ट्यांतील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांच्या डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला होता. या गावांतील डोंगर भागांपासून नजीक असलेल्या ग्रामस्थांना त्यावेळी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. या नोटिसांमध्ये येथील ग्रामस्थांनी त्वरित आपापल्या घरांचा विमा उतरविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थांच्या जीविताच्या सुरक्षिततेसंबंधी यात काहीही उल्लेख नव्हता. त्यावेळी तत्काळ शासनस्तरावर डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला; परंतु त्याचा अहवाल मात्र अद्याप आलेला नसल्याचे चौकशी अंती समजते.

कळंबा धरणाचे पाणी हे येथे कित्येक वर्षे मुरत असल्याने माती ढिली होऊन हे डोंगराचे भाग भविष्यात कोसळणारच आहेत. आम्ही जंगल भागात फिरत असताना बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याचे पाहिले आहे. भविष्यात हे धोकादायक आहे. -गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग