शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:51 PM

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे ...

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे आले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळ तसेच कणकवलीवासीयांतर्फे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजनप्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावडे बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजनप्रेमींना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावास्येच्या काळरात्री भजनप्रेमींवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील कर्ती-सवरती माणसे मृत झाली होती. या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधीतच पोहोचली. या संकटसमयी अनेक व्यक्ती मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमींना सावंतवाडी व वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५० वर्षे त्यांचे कुटुंबीय तसेच कणकवलीवासीय सुदर्शन मित्रमंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत.आज डबलबारी भजनाचा कार्यक्रमसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तेलीआळी येथे कणकवलीवासीय एकत्र येतात. भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिंना आदरांजली वाहिली जाते. या अपघाताला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच भजनही होणार आहे. त्यानंतर आमने-सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पोखरण येथील बुवा समीर कदम व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.