शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कणकवली शहर शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी : रवींद्र चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:05 IST

कणकवली शहर आदर्श बनविण्यासाठी तसेच येथील सर्वांगीण विकासासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाचे शासन आल्यावर या शहरासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे, असे नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण येथे म्हणाले.

ठळक मुद्देकणकवली शहरासाठी कोट्यवधींचा निधी : चव्हाण नगरपंचायतीत भाजपची सत्ता येण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्न करणार

कणकवली : कणकवली शहर आदर्श बनविण्यासाठी तसेच येथील सर्वांगीण विकासासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाचे शासन आल्यावर या शहरासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे.  अजून ५ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यानी मंजूर केला असून तो लवकरच नगरपंचायतीला मिळेल. असे सांगतानाच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी विजयाच्यादृष्टीने सर्व पदाधिकारी संघटितरित्या सर्वतोपरी प्रयत्न करतील. असा ठाम विश्वास नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, अतुल काळसेकर, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, राजश्री धुमाळे, जयदेव कदम, राजन म्हापसेकर, राजू राऊळ, बंड्या मांजरेकर, हनुमंत सावंत, दीपक सांडव, महेश सावंत, यशवंत आठलेकर, प्रभाकर सावंत, सीमा नानिवडेकर, प्रज्ञा ढवण, गीता कामत, जयश्री आडीवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कणकवली नगरपंचायतीला शासनाकडून मिळालेल्या निधीतून होणाºया विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच काही कामांचे उदघाट्न शुक्रवारी करण्यात आले आहे. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील सुचविलेल्या कामांची परिपूर्ती भाजपच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जनतेला विविध सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यामुळे ते विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाहीत.ते पुढे म्हणाले, पाच जिल्ह्यांचा भाजपचा संपर्कमंत्री म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यात माझा संपर्क सुरु असतो. भाजपची विचारसरणी पटणारे इतर पक्षातील लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सर्वत्र शत-प्रतिशत भाजप झाला पाहिजे यासाठी आमचे संघटीटरित्या प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. असेही मंत्री चव्हाण यावेळी म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे यासाठी अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान सुरु आहे. व लोकांचाही त्याला प्रतिसाद मिळत आहे.नगरपंचायतीचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून यावा ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व संदेश पारकर यांची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे. संदेश पारकर व त्यांचे बंधू कन्हैया पारकर नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यामुळे त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद नेहमीच मिळत असल्याचेही ते म्हणाले.युतीबाबत निर्णय निवडणूक कार्यक्रमानंतरकणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर युती करायची का? याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घेतील. भाजप जिल्हा कोअर कमिटीचे याबाबतचे मतही यावेळी विचारात घेतले जाईल. असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.विकासाच्या मुद्यावर निवडणूकयावेळी संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहरासाठी आतापर्यंत भाजप शासनाकडून १० कोटीहून अधिक निधी देण्यात आला आहे. विकासाच्या मुद्द्यावर कणकवली नगरपंचायत निवडणूक लढविली जाणार आहे. तसेच पुढील पाच वर्षात शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी किमान पाच विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला.भाजपमध्ये गटबाजी नाहीसिंधुदुर्ग जिल्हा भाजपात कोणतीही गटबाजी नाही. येथे कोणीही नेते नाहीत सर्वच कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते म्हणूनच ते मोठे झाले आहेत. माझे येथील सर्वच पदाधिकाºयांशी मैत्रीचे संबध आहेत. येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी एकदिलाने, एकविचाराने प्रयत्न करीत आहेत. असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात रोजगार निर्मितीचे नियोजनच्कणकवली शहरातील सांडपाणी समस्या कायमची सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील.च्कणकवलीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री नियोजन करीत आहेत.च्विकासाबाबत आम्ही जे जे ठरविले होते ते सत्ता आल्यानंतर केले आहे. आगामी काळात अनेक विकास कामे पूर्णत्वास गेलेली दिसतील.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गministerमंत्रीBJPभाजपा