शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:11 IST

जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पावसामुळे मालमत्तांचे नुकसान

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून आतापर्यंत १५२ घरांचे , २३ गोठ्यांचे व इतर मालमत्तेचे मिळून ४९ लाख ६२ हजार ८६० रुपयाचे अतिवृष्टिमुळे नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. १ जून पासून जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे १५२ घरांचे व २३ गोट्यांचे नुकसान झाले आहे. तर इतर १३ मालमत्ताचे नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांमध्ये ६ घरे पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये एवढे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या नुकसानीमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील २, कुडाळ तालुक्यातील १ आणि देवगड तालुक्यातील ३ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्यापूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांची व गोट्यांची तसेच सार्वजनिक मालमत्तेची नुकसान झाले आहे.जिल्ह्यात १५२ घरांची पडझडजिल्ह्यातील १२७ पक्क्या घरांची तर २५ कच्च्या घरांची अशाप्रकारे १५२ घरांची पडझड झाली आहे. २३ गोठे आणि १३ इतर मालमत्ता यांची नुकसानी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला ,कुडाळ आणि देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १ जून पासून आतापर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे १२७ पक्क्या घरांचे ३३ लाख ८० हजार ११० रुपये नुकसान झाले आहे. २५ कच्च्या घरांचे ४ लाख ९० हजार एवढे नुकसान झाले आहे. तर २३ गोठ्यांचे ५ लाख ६९ हजार ६५०रुपये एवढे नुकसान झाले आहे. दुकाने,स्टॉल अश्या इतर १३ मालमत्तांचे ५ लाख २३ हजार १००रुपये असे मिळून आतापर्यंत एकूण ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस