शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

कणकवली तालुक्यातील 56 नवनिर्वाचित सरपंच स्वीकारणार 29 डिसेंबर रोजी कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:55 IST

कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात 58 ग्रामपंचायतीत थेट सरपंच 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार

कणकवली : कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत.त्याचबरोबर थेट निवडून आलेल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली सचिव ग्रामसेवक हे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा घेवून उपसरपंचाची निवड करणार आहेत.मुदत संपलेल्या तालुक्यातील 63 पैकी 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबरला होऊन 17 ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. यात तालुक्यातील 14 सरपंच आणि 9 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. थेट सरपंच पदासाठी 44 तर 49 ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.नवनिर्वाचित सरपंचांमध्ये असलदे येथील उपसरपंच असलेल्या गुरुप्रसाद वायंगणकर यांचा तसेच वाघेरीचे सरपंच असलेल्या संतोष राणे यांचा समावेश आहे. संतोष राणे पुन्हा एकदा वाघेरीच्या सरपंच पदी विराजमान होणार आहेत.या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना सरपंच पदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने समर्थ विकास पॅनेल स्थापन करून कणकवली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेना , भाजपनेही काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे.तालुक्यात 58 पैकी 40 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर समर्थ विकास पॅनेलचे वर्चस्व असल्याचा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेचे अध्यक्ष सरपंच हे असणार आहेत.

उपसरपंच निवड करण्यात येणार असून या निवडीसाठी इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा रहाणार आहे. संबधित ग्रामपंचायतीत निवडून आलेले पॅनेल कोणाला मदत करणार यावरहि उपसरपंचांची निवड अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी कणकवली तालुक्यातील अंतर्गत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग