शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान प्राप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:12 IST

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष ...

ठळक मुद्देमहामार्गालगत शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात केली लागवड वैभव नाईक यांची माहिती

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्ष लागवडीची कामे केली असून त्यासाठीचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे रोपवनपूर्व प्रथम वर्ष अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१९ मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली होती. परंतु त्याचे अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत तसेच आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सूरु ठेवला होता. त्या पाठपुरवठ्याला यश आले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.कणकवली ते झाराप पर्यंत १७० शेतकऱ्यांनी शासनाच्या योजने अंतर्गत १ कि मी पर्यंतच्या आपल्या खाजगी क्षेत्रात ५२,६३१ वृक्षांची लागवड केली होती. त्यासाठी प्रथम वर्षासाठी १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान देणे अनिवार्य होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागात वर्ग झाले नव्हते.

त्यामुळे संबधित लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधींकडे हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मागणी करत होते. यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आपण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख २६ हजार ८८५ रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले आहे. हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडून लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप केले जाईल . असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग