शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

लैंगिक जीवन : जर मोठा ब्रेक घेतला तर...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:47 IST

ऑफिसमधील बिझी शेड्युल, तणाव, टेक्नॉलॉजीचा जीवनातील वाढता वापर ही अशी कारणे आहेत, ज्यामुळे अनेकांच्या जीवनातील शारीरिक संबंधाचे क्षण कमी होत आहे.

(Image Credit : midliferocksblog.com)

शारीरिक संबंधाबाबत आजही आपल्या समाजात वेगवेगळ्या धारणा आहेत. तरुण एकीकडे कमी वयातच शारीरिक संबंध ठेवत आहेत. तर दुसरीकडे लग्न झालेल्यांमध्ये याबाबत अरसिकता बघायला मिळत आहे. ऑफिसमधील बिझी शेड्युल, तणाव, टेक्नॉलॉजीचा जीवनातील वाढता वापर ही अशी कारणे आहेत, ज्यामुळे अनेकांच्या जीवनातील शारीरिक संबंधाचे क्षण कमी होत आहे. म्हणजे लोक याकडे कमी आकर्षित बघायला मिळत आहेत. सुरुवातीला शारीरिक संबंधात आलेली कमतरता जाणवते, पण लवकर यासोबत ताळमेळ बसवला जातो आणि नंतर हळूहळू यातून मन उठून जातं. चला जाणून फार जास्त काळासाठी तुम्ही शारीरिक संबंधातून ब्रेक घेतला तर काय होऊ शकतं. 

विश्वास ढासळतो

जास्तीत जास्ती जोडप्यांच्या आयुष्यात शारीरिक संबंधात आलेली कमतरतेचा प्रभाव थेट त्यांच्या नात्यावर पडतो. याचा पहिला वार हा विश्वासावर होतो. नात्यात राहण्याचा आनंद, संतुष्टी आणि कुणाकडून प्रेम मिळण्याची भावना कमी कमी होत जाते. तज्ज्ञ सांगतात की, ज्या जोडीदारांमध्ये बिझी शेड्युल किंवा कामात व्यस्त असल्याने शारीरिक संबंध कमी होतो, त्यांच्यात आधी अपराधी भावना येते. पण नंतर हळूहळू त्यांच्यातील ही भावना नष्ट होऊन त्यांना ही बाब सामान्य वाटू लागते.

नातं येतं अडचणीत

तेच दुसरा जोडीदार याकडे सहानुभूतिपूर्वक बघू लागतो, पण नंतर त्याला किंवा तिला उपेक्षित केल्यासारखं वाटू लागतं. अशात जर लैंगिक जीवन आधीसारखं सुरळीत झालं नाही तर त्यात उदासीनता येऊ शकते. नंतर हळूहळू वेगवेगळी कारणे शोधून दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात. हीच छोटी छोटी भांडणे दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतात. 

तज्ज्ञांनुसार, ज्या जोडीदारांच्या आयुष्यात शारीरिक संबंधात कमतरता येते किंवा कमी वेळा ते जवळ येतात, त्यांच्यात ऑक्सिटोसिनसारखे बॉंडींग हार्मोन्सचं प्रमाण कमी होऊ लागलं. इतकेच नाही तर त्यांच्यात ही भितीही निर्माण होते की, आपला जोडीदार शारीरिक संबंधाची गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाकडे तर आकर्षित होत नाहीये ना? त्यांच्यात संशयाची भावना निर्माण होते. पण हेही लक्ष देण्यासारखं आहे की, शारीरिक संबंध कमी ठेवत असलेली जोडपी असंतुष्ट असेल किंवा नाखूश असेल. शारीरिक संबंध ठेवायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या मार्गांनीही जोडीदारावर प्रेम व्यक्त करु शकता. 

चिडचिड वाढते

चांगलं लैगिक जीवन आपलं मानसिक आरोग्य सामान्य ठेवण्यासाठी मदत करतं. एका स्कॉटिश अभ्यासानुसार, जे जोडीदार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शारीरिक संबंध ठेवतात, ते शारीरिक संबंधातून सन्यास घेणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आनंदी असतात. शारीरिक संबंध ठेवताना मेंदूमध्ये फील गूड केमिकल्स रिलीज होतात. एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हे केमिकल्स आपल्याला आनंद देतात. हा अंतर्गत आनंद आपल्या चेहऱ्यावरही दिसतो. तेच ज्या लोकांचं लैंगिक जीवन सुरळीत नसतं त्यांची चिडचिड अधिक वाढते. अशांना कारण नसताना फार लवकर रागही येतो.   

टॅग्स :Sex Lifeलैंगिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप