शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

कोरोना कारण : कामांचा जलद गतीने निपटारा होण्याचा प्रशासनाला विश्वास लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण ...

कोरोना कारण : कामांचा जलद गतीने निपटारा होण्याचा प्रशासनाला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कामासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून सातारा जिल्हा परिषदेत ‘ई टपाल प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होईल. त्याचबरोबर प्राप्त अर्ज, निवेदन, समस्या आणि मागणीचा निपटारा जलद गतीने होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच सध्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज शेकडो नागरिक कामासाठी येतात. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार जिल्हा परिषदेतील विभागामध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी कमी करणे आवश्यक ठरले आहे. तसेच कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना वेळ न दिल्यास त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. जिल्हा परिषदेमध्ये येणार्‍या नागरिकांबरोबर चर्चा करण्यात जास्त वेळ जातो. त्यामुळे प्रशासकीय कामकाजास वेळ कमी पडण्याची शक्यता असते. नागरिकांनाही खूप दूरवरून पैसा, वेळ खर्च करून यावे लागते. त्यांचाही वेळ आणि पैसा वाचविणे आवश्यक आहे.

कामानिमित्त जास्त दूरवरून नागरिक येतात. मात्र, अधिकारी कार्यालयात हजर नसतील किंवा दौर्‍यावर, सभेला उपस्थित राहण्यासाठी गेल्यास कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई टपाल प्रणाली’चा वापर करण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार सुरुवात करण्यात आली आहे.

या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास मदत होणार आहे. अर्ज, निवेदने, समस्या व मागणीचा निपटारा जलद गतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये अभ्यागतांची व नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर नागरिक, कर्मचार्‍यांचे अर्ज, निवेदने, मागणी, सूचना पत्रके, जिल्हा परिषदेच्या इ मेल आयडीवर ऑनलाईन सादर करावीत. अर्जाचा तपशिल संक्षिप्तपणे नोंद करून पाठविता येईल. निवेदन देणार्‍याचे नाव, मोबाईल क्रमांक आदी तपशिल देणे बंधनकारक आहे. शासन आदेशानुसार निनावी अर्जाची दखल घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट :

प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन...

जिल्हा परिषदेच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षामधून अभ्यागतांनी सादर केलेल्या अर्जाचे सनियंत्रण केले जाणार आहे. अर्ज दैनंदिन स्वरूपात आयटीसेल यांच्यामार्फत संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात सोमवारी होणार्‍या खातेप्रमुखांच्या बैठकीत याबाबत आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेतील गर्दी कमी करून प्रशासनास कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे व कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिक, अभ्यागत, लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी ‘ई टपाल प्रणाली’चा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.

.........................................................................