शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:18 IST

केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्यात कोणाला मतदान करायचे, याचा विचार करावा, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवक हो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा :अमोल कोल्हेकऱ्हाडात महाविद्यालयीन युवकांशी संवाद

कऱ्हाड  : केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्यात कोणाला मतदान करायचे, याचा विचार करावा, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी कऱ्हाड  येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी कऱ्हाड येथील विद्यानगरमधील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहराध्यक्ष नंदकुमार पटाने उपस्थित होते.अमोल कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान मी महाविद्यालयीन युवकांची मुद्दाम संवाद साधत आहे. युवक हे देशाचे भविष्य आहे. सातारा जिल्ह्यातील युवकांना राजकारणाची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर सध्याची राजकीय परिस्थिती, देशात आलेली मंदीची लाट आणि त्यामुळे निर्माण झालेला बेकारीचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. युवकांना सगळ्याची जाणीव झाली तर ते नक्कीच बदल घडवून आणू शकतात.यावेळी युवकांनी काही प्रश्न विचारले. कोल्हे म्हणाले, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी अहोरात्र लढले. जगले, स्वराज्य उभे केले, त्याप्रमाणे आजच्या युवकांनी उद्याचे भविष्य घडविण्यासाठी विचार करून योग्यप्रकारे मतदान केले पाहिजे.कोल्हे म्हणाले, चंद्रकोर काढल्याने कोणी शिवाजी अथवा संभाजी होत नाही. त्यांचे विचार ही आत्मसात करावे लागतात. आजच्या युवकांनी रस्त्यावर चंद्रकोर काढून फिरण्यापेक्षा आया बहिणी संरक्षणासाठी पुढे यावे. पूरस्थितीवरील प्रश्नावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारकडे मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र दुर्दैवाने या सरकारला केंद्र सरकारकडून मदत मिळवता आलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानातून हवाई पाहणी करतात. तर दुसरीकडे या पूरग्रस्त बांधवांसाठी रस्त्यावरून समाजबांधव गाड्या-गाड्या भरून जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात. समाजातून पूरग्रस्तांना होत असलेली मदत पाहता शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा जनता करत नाही. शिरूर मतदारसंघातून इतक्या क्षमतेने पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात आलेली आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे शेवटी कोल्हे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण