तुमसरात पाणी टंचाई : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: June 21, 2016 00:34 IST2016-06-21T00:34:30+5:302016-06-21T00:34:30+5:30

तुमसर शहरात नियोजनाअभावी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वैनगंगा नदी पात्रात पाणी नाही. नदीपात्रातील रेती पंपात शिरल्याने पंपाने काम करणे बंद केले.

You have water scarcity: the security question on the anvil | तुमसरात पाणी टंचाई : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तुमसरात पाणी टंचाई : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रदीप यादव--सातारा --आजपर्यंत आपल्याला शालेय शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान एवढंच माहीत होतं. कारण अभ्यासक्रमात असेल तेवढंच शिकवलं जातं आणि त्याच ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. पण काही शाळा पुस्तकापलीकडचं शिक्षण देतात. शाहूपुरी येथील शाहूपुरी माध्यमिक विद्यालय ही त्यापैकी एक शाळा. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देत प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिले जाते. शाळेतील मुलं शेती करतात अन् बालकुमार साहित्य संमेलनाची सर्व जबाबदारीही लीलया पार पाडतात. एकूणच एक सुजाण पिढी घडविण्याचे काम ही शाळा करत आहे.
शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी आवश्यक असणारे ज्ञान देण्याचे काम या शाळेमध्ये होत आहे. आधुनिक शिक्षण घेण्याबरोबरच या पिढीला शेतीचे ज्ञानही असायला हवे. यासाठी शाळेतील मुलांना शेतीच्या बांधावर नेऊन शेती कशी केली जाते, बियाणे, शेतीची अवजारे याचे प्रत्यक्ष शिक्षण दिले जाते. एवढेच नव्हे तर या शाळेतील मुलांना शेती करण्याची संधी दिली जाते. मुलांचे गट तयार करून शेतीचे प्लॉट दिले जातात. यामध्ये मुलं फळभाज्या, पालेभाज्या लावतात. त्यांची देखभाल करतात. यातून मिळणारे उत्पन्न त्या-त्या गटाला दिले जाते. उत्कृष्ट शेती पिकविणाऱ्या मुलांना आदर्श शेती पुरस्कारही दिला जातो. यामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भारत भोसले यांनी दिली. याशिवाय वीज, पाणी, इंधन बचत, परसबाग, घरातील कामात मदत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे अशा स्पर्धा घेऊन घर सुंदर करण्याचे धडे दिले जातात. शेतात नेऊन त्यांना बियाणांची माहिती दिली जाते. देशी वाण कसे ओळखावे, शेतात मेंढरं बसविण्याचे फायदे काय, शेतीची अवजारे कशी असतात याची माहिती दिली जाते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढावी, यासाठी विज्ञानयात्रा काढली जाते. उपकरणांची निर्मिती करणे, विज्ञान अभ्यास याचे धडे दिले जातात. या शाळेतून शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही, अशा पद्धतीचे शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे, असे भारत भोसले यांनी सांगितले.


विद्यार्थी बनतायत साहित्यिक

शाहूपुरी विद्यालयात बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याची सर्व जबाबदारी मुलांनीच घेतलेली. संमेलनाचे अध्यक्षपदही दहावीतील मुलानं भूषविलं. कविसंमेलनात मुलांनी स्वत:च्या कविता सादर केल्या. चंद्रकांत देशमुख यांचा वळिवाच्या सरी, कोमल चिकणे हिचा स्नेहबंध तर ऐश्वर्या बेनिसीर हिचा शलाका हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. यातून भविष्यात एखादा लेखक, कवी, वक्ता, सूत्रसंचालक घडू शकतो.
- भारत भोसले, संस्थापक अध्यक्ष

Web Title: You have water scarcity: the security question on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.