शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘होयबां’ंमुळे विकासाला खीळ

By admin | Updated: January 28, 2015 00:58 IST

बाळासाहेब बाबर : अतिक्रमणांना पाठीशी घातले जाते

सातारा : विरोधी पक्षनेता अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी अतिक्रमण या मोहिमेवरून ‘धनदांडग्यांना संरक्षण आणि गोरगरीबांची पिळवणूक’ असा पालिकेचा कारभार सुरू आहे. बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना पालिका पदाधिकारीच पाठीशी घालत आहेत. पालिकेत ‘होयबा’ नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले जात नसल्याने घनकचरा सारखे प्रकल्प आणि अतिक्रमणे काढली जात नाहीत, असा आरोप बाबर यांनी करत पालिका कारभाराचे वाभाडे काढले.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील २१ विकास कामांच्या विषयांपैकी २० विषयांना सभागृहात मंजूरी देण्यात आली. शहराच्या हद्दीबाहेरील उपनगरे व शाहूपुरी ग्रामपंचायतीचा कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकण्याच्या विषयास मंजूरी न देता तो विषय स्थगिती देण्यात आली. सभेला नविआ, साविआ आघाडीचे नगरसेवकांची उपस्थिती होती.शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने मोहिम हाती घेतली. अतिक्रमणे काढताना मुख्य रस्त्यांवरील धनदांडण्यांच्या इमारतीची अतिक्रमणे न हटविता गोरगरीबांची गल्लीबोळातील अतिक्रमणे काढून दिखावा केला आहे. त्याचबरोबर यापुर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील करंजे तर्फ सातारा औद्योगिक वसाहतीत पालिकेच्या अतिरीक्त जागा काहींनी बळकावून अतिक्रमण केले आहे. त्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात चौकशी समिती नेमून काढण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. अतिक्रमण विषयांवर सभागृहात केवळ चर्चा होते, कारवाई होत नाही. हे गतीमान कारभाराचे लक्षण नाही अशी टिकाही केली. रवी पवार यांनी प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा अभियंता पंढरीनाथ साठे यांना धारेवर धरले. साठे यांची बदली झाल्याने पाणी प्रश्न ते गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे गणेश टाकीतून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यासाठी साठे यांना फोन केला तर त्यांचा फोन लागत नाही. फोन बंद केलेला असतो. यावर साठे म्हणाले, माझा फोन चालू असतो, कधीही बंद नसतो. आपण पाणी किती वेळ सोडतो याचे वेळापत्रक देण्याची व्यवस्था करू असा खुलासा साठे यांनी सभागृहात केल्यावर रवी पवार भलतेच भडकले. अशा निरूउत्तर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सभागृहात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)घरपट्टीला व्याज आकारणीच्या विषयावर बोलताना नगरसेविका दिपाली गोडसे म्हणाल्या, ‘पालिका नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी केवळ घरपट्टी बील दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांची मुदत देते. ती घरपट्टी भरण्याची अंतिम मुदत ही मार्च अखेरपर्यंत असते. मात्र देय तारखेपासून तीन महिन्यांत घरपट्टी भरली नाही तर त्यावर व्याज आकारणी केली जाते. मार्चपर्यंत अंतीम मुदत असल्याने व्याज आकारणी करू नये असा ठराव पालिकेने करावा आणि शासनाला पाठवावा,’ अशी मागणीही गोडसे यांनी केली.पवारांकडून घरचा आहेरपालिकेने शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहिम राबविली आहे. सदरबझारमध्ये सिम्बॉयसेस हॉस्पिटमध्ये पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले. अधिकाऱ्यांना माहिती समजल्यानंतर अधिकारी कारवाईसाठी गेले होते. मात्र सभागृहातील बहुचर्चित एका नगरसेवकांने त्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, असा जाहीर आरोप रवींद्र पवार यांनी केला.