शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

तामिळनाडू, पश्चिम बंगालमधून प्रकल्प सहज बाहेर गेले असते?, अमोल कोल्हेंनी केला सवाल; म्हणाले..

By प्रमोद सुकरे | Updated: October 3, 2022 17:58 IST

मग केंद्राचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

कऱ्हाड : महाराष्ट्रातून 'वेदांता' प्रकल्प जेवढ्या सहज गुजरातला गेला तेवढ्या सहज तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून बाहेर गेला असता का? असा सवाल करीत प्रादेशिक अस्मिता टोकदार करा. मग केंद्राचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल, असे मत  राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.कराड येथे क्रिडाई संस्थेच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब पाटील, सुभाषराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.अमोल कोल्हे म्हणाले, खरंतर तुम्ही भाग्यवान आहात. महाराष्ट्रात कऱ्हाड आणि नांदेडलाच दोनवेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. तर एकट्या बारामतीला चारवेळा संधी मिळाली आहे हा भाग वेगळाच. कऱ्हाडला शैक्षणिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे.त्याचबरोबर बेळगाव सोडल्यावर मध्ये फक्त कऱ्हाडच वैद्यकीय ‘हब’ आहे. आणि ज्याठिकाणी शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रगती आहे तेथे इतर प्रगतीला मोठी संधी असते. त्याचा फायदा सर्वांनी घ्यायला हवा.छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नव्हे तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. त्यामुळेच सी बी एस ई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास शिकविला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगीतले.आग्रा भेटीचा थरार!लवकरच प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, या चित्रपटात आग्रा भेटीचा थरार उलगडून दाखविला आहे. इतर राज्यात चंदन, सोने तस्कर यांच्यावर चित्रपट काढले  जातात. तेथील लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ते इतर भाषेत डब होतात. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला हा चित्रपट एवढा लोकप्रिय करायचाय की तो इतर भाषेत डब झाला पाहिजे. म्हणजे छत्रपतींचा इतिहास सर्वदूर पोहोचेल.

ते कोणी सांगत नाहीकऱ्हाडला विमान उतरायला पाहिजे, त्याचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे हे बरोबर आहे. मात्र, त्यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठे संकट आले होते, हे अनेकजण सांगतात. ते सोडविण्यासाठी आमच्याकडे क्रिडाई संस्था आली. आम्ही त्यांना मदत केली. ते संकट दूर झालं. मात्र, ही अडचण कशामुळे आणि कोणामुळे आली, यावर कोणी बोलत नाही. असा चिमटा आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे