शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

काम झालं खास; आता पावसाची आस पाणीदार गावांसाठी श्रमदान; तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:10 IST

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या ...

ठळक मुद्देरानमाळावर डोलणार फळबागा

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे दुष्काळी गावे पाणीदार होत आहेत. हे चित्र पाहून यंदाच्या या तिसºया स्पर्धेत राज्यातील ७० हून अधिक तालुके उतरले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील जनतेने दुष्काळ हटविण्याचा घेतलेला निर्णय सर्वस्वी फायदेशीर ठरलेला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा १५० हून अधिक गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी श्रमदान केले.

त्या माध्यमातून डीपसीसीटी, नालाबांध, बांधबंदिस्त, छोटे बंधारे, गॅबियन बंधारे आदी कामे करण्यात आली. मात्र, स्पर्धेचा कालावधी संपत येऊ लागला तसतसा श्रमदानाने वेग घेतला. काही गावांनी तर सकाळ व सायंकाळच्यावेळी श्रमदान करण्यास सुरुवात केली. तर काहींनी झालेल्या कामाचे मोजमाप रात्रीच्या सुमारासही केले. हे सर्व कष्ट होते ते पाणीदार गावासाठी.

वॉटर कप स्पर्धा संपली असून, आता परीक्षण व इतर कामे होणार आहेत. या स्पर्धेचा निकाला लागायला किमान दोन महिने जाणार आहेत. आता स्पर्धेत सहभागी गावांना पावसाची आस लागली आहे. कारण पाणी अडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी दमदार पाऊस आवश्यक आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यास सर्वच ठिकाणी पाणीसाठा होऊन जमिनीतील पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा गावाची टंचाई दूर होणार आहे. तसेच आजही या दुष्काळी भागातील माळरानावरील शेकडो एकर जमीन पडीक आहे. ही जमीनही पाणी उपलब्ध झाल्यास बागायताखाली येऊ शकते. माळरानावर फळबागा डोलू शकतात. त्यासाठीही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.सातारा जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेत शेकडो गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची सांगता मंगळवारी झाली. काही तासच शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने गावकरी श्रमदानात सहभागी झाले होते. गावोगावी उठलेले तुफान मंगळवारी शमलं; पण दुष्काळ निवारणाची जिद्द संपलेली नाही

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर