शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

काम झालं खास; आता पावसाची आस पाणीदार गावांसाठी श्रमदान; तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:10 IST

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या ...

ठळक मुद्देरानमाळावर डोलणार फळबागा

सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दुष्काळी भागातील माळरानावर भविष्यात फळबागा डोलताना पाहावयास मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे दुष्काळी गावे पाणीदार होत आहेत. हे चित्र पाहून यंदाच्या या तिसºया स्पर्धेत राज्यातील ७० हून अधिक तालुके उतरले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील जनतेने दुष्काळ हटविण्याचा घेतलेला निर्णय सर्वस्वी फायदेशीर ठरलेला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा १५० हून अधिक गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी श्रमदान केले.

त्या माध्यमातून डीपसीसीटी, नालाबांध, बांधबंदिस्त, छोटे बंधारे, गॅबियन बंधारे आदी कामे करण्यात आली. मात्र, स्पर्धेचा कालावधी संपत येऊ लागला तसतसा श्रमदानाने वेग घेतला. काही गावांनी तर सकाळ व सायंकाळच्यावेळी श्रमदान करण्यास सुरुवात केली. तर काहींनी झालेल्या कामाचे मोजमाप रात्रीच्या सुमारासही केले. हे सर्व कष्ट होते ते पाणीदार गावासाठी.

वॉटर कप स्पर्धा संपली असून, आता परीक्षण व इतर कामे होणार आहेत. या स्पर्धेचा निकाला लागायला किमान दोन महिने जाणार आहेत. आता स्पर्धेत सहभागी गावांना पावसाची आस लागली आहे. कारण पाणी अडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यासाठी दमदार पाऊस आवश्यक आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यास सर्वच ठिकाणी पाणीसाठा होऊन जमिनीतील पाणीपातळी वाढणार आहे. त्याचा फायदा गावाची टंचाई दूर होणार आहे. तसेच आजही या दुष्काळी भागातील माळरानावरील शेकडो एकर जमीन पडीक आहे. ही जमीनही पाणी उपलब्ध झाल्यास बागायताखाली येऊ शकते. माळरानावर फळबागा डोलू शकतात. त्यासाठीही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत.सातारा जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धेत शेकडो गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची सांगता मंगळवारी झाली. काही तासच शिल्लक असल्याने मोठ्या संख्येने गावकरी श्रमदानात सहभागी झाले होते. गावोगावी उठलेले तुफान मंगळवारी शमलं; पण दुष्काळ निवारणाची जिद्द संपलेली नाही

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर