शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'शहापूर'ने भागविली तहान; आता 'कास' व्हावे गतिमान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 15:50 IST

गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे.

सचिन काकडे

सातारा : गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे. शहापूर योजना लाभदायी असली तरी तिचा खर्च अमाप आहे. यामुळे शहापूरचा हत्ती पोसण्याऐवजी कास योजनेचे काम गतीने मार्गी लागणे गरजेचे आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराचा वाढता विस्तार पाहता कास योजनेला शहापूर योजनेची जोड देण्यात आली. उरमोडी धरणावर साकारण्यात आलेली ही योजना २००५ पासून कार्यान्वित झाली अन् नागरिकांच्या घरात हक्काचं पाणी आलं. या योजनेमुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली असली तरी या योजनेवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करावा लागत आहे.

धरणातून पाणी उचलणे, शुद्धिकरण करणे, वितरण व्यवस्था व देखभाल दुरुस्ती आदी कामांवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. यामध्ये केवळ वीजबिलाचा खर्च हा दीड कोटींच्या घरात आहे. गेल्या पंधरा वर्षांचा विचार केल्यास शहापूर योजनेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च झाला आहे. तो टाळण्यासाठी आता प्रशासनाला नव्याने साकारत असलेली कास योजना अधिक गतिमान करायला हवी, असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

अशी आहे शहापूर योजना

- योजना २००५ साली कार्यान्वित

- उरमोडी धरणातून पाणी उचलावे लागते

- वीज बिलावर महिन्याला १४ लाख खर्च

- गाळ काढणे, देखभाल दुरुस्तीवर वार्षिक २९ लाख खर्च

- दररोज ७ लाख ५० हजार लीटर पाणीपुरवठा

कास योजना का हवी

- तलावातून पाणी उचलावे लागत नाही

- सायफन पद्धतीने पाणी येते

- केवळ उन्हाळ्यात इंजिन लावून पाणी पाटात सोडले जाते

- देखभाल दुरुस्तीवर वर्षाला ३० लाख खर्च

- दररोज ५.५० लाख लीटर पाणीपुरवठा

‘कास’ उंचीवाढीमुुळे अनेक प्रश्न मार्गी

शहराच्या पूर्व भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात वर्षाकाठी ७ हजार रुपये पाणीपट्टी नागरिकांकडून आकारली जाते, तर पालिका कररुपात केवळ २ हजार रुपये घेते. कास धरणाची उंची वाढल्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ होणार असून, नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. पालिकेकडून जीवन प्राधिकरणलादेखील पाणी दिले जाऊ शकते. पालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागालादेखील कास योजना वरदान ठरू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारWaterपाणी