शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'शहापूर'ने भागविली तहान; आता 'कास' व्हावे गतिमान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 15:50 IST

गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे.

सचिन काकडे

सातारा : गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे. शहापूर योजना लाभदायी असली तरी तिचा खर्च अमाप आहे. यामुळे शहापूरचा हत्ती पोसण्याऐवजी कास योजनेचे काम गतीने मार्गी लागणे गरजेचे आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराचा वाढता विस्तार पाहता कास योजनेला शहापूर योजनेची जोड देण्यात आली. उरमोडी धरणावर साकारण्यात आलेली ही योजना २००५ पासून कार्यान्वित झाली अन् नागरिकांच्या घरात हक्काचं पाणी आलं. या योजनेमुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली असली तरी या योजनेवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करावा लागत आहे.

धरणातून पाणी उचलणे, शुद्धिकरण करणे, वितरण व्यवस्था व देखभाल दुरुस्ती आदी कामांवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. यामध्ये केवळ वीजबिलाचा खर्च हा दीड कोटींच्या घरात आहे. गेल्या पंधरा वर्षांचा विचार केल्यास शहापूर योजनेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च झाला आहे. तो टाळण्यासाठी आता प्रशासनाला नव्याने साकारत असलेली कास योजना अधिक गतिमान करायला हवी, असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

अशी आहे शहापूर योजना

- योजना २००५ साली कार्यान्वित

- उरमोडी धरणातून पाणी उचलावे लागते

- वीज बिलावर महिन्याला १४ लाख खर्च

- गाळ काढणे, देखभाल दुरुस्तीवर वार्षिक २९ लाख खर्च

- दररोज ७ लाख ५० हजार लीटर पाणीपुरवठा

कास योजना का हवी

- तलावातून पाणी उचलावे लागत नाही

- सायफन पद्धतीने पाणी येते

- केवळ उन्हाळ्यात इंजिन लावून पाणी पाटात सोडले जाते

- देखभाल दुरुस्तीवर वर्षाला ३० लाख खर्च

- दररोज ५.५० लाख लीटर पाणीपुरवठा

‘कास’ उंचीवाढीमुुळे अनेक प्रश्न मार्गी

शहराच्या पूर्व भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात वर्षाकाठी ७ हजार रुपये पाणीपट्टी नागरिकांकडून आकारली जाते, तर पालिका कररुपात केवळ २ हजार रुपये घेते. कास धरणाची उंची वाढल्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ होणार असून, नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. पालिकेकडून जीवन प्राधिकरणलादेखील पाणी दिले जाऊ शकते. पालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागालादेखील कास योजना वरदान ठरू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारWaterपाणी