शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

जिल्ह्यात मानवी विकासाबाबतचे काम समाधानकारक : जलाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:54 AM

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देआढावा बैठक : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांच्या कामाचे कौतुकजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा

सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा काही भाग अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भीक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता; पण गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्त असून, त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सातारा हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा असून, आता घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार आहे.’‘जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसºया क्रमांकावर असून, आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.जलजा म्हणाल्या, ‘स्त्री-पुरुष जन्मदराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे त्यावर उपाय करावेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर लक्ष द्यावे.’गुन्हे निकालाचे प्रमाण ४२ टक्केजिल्ह्यात तीस पोलिस ठाणे, अठरा आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद पथक सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.