शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

By नितीन काळेल | Updated: July 16, 2025 15:35 IST

हुमगावात फटाके फुटले, बालेकिल्ल्याची पडझड रोखण्याचे आव्हान..

नितीन काळेलसातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्षपदी निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे यांची निवड केली. यामुळे पवार यांच्या राष्ट्रवादीचा कारभार साताऱ्यातूनही चालणार आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या निवडीने जन्मगाव हुमगावात (ता. जावळी) फटाके फुटले असून साताऱ्यातही जल्लोष झाला. त्यातच या निवडीने साताऱ्यालाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बनण्याचाही पहिल्यादा संधी मिळाली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजीनामा दिला. त्यानंतर मुंबईतून प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली. शिंदे हे पवार यांचे विश्वासू, तसेच निष्ठावंत मानले जातात. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेते, पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले; पण काही मोजके नेते शरद पवार गटात राहिले, त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव प्रथम होते. त्यांनीच सातारा जिल्ह्यात पक्ष टिकवून ठेवला. प्रसंगी अनेक राजकीय मातब्बरांनाही अंगावर घेतले. याच निष्ठेचे हे फळ मानले जात आहे.बालेकिल्ल्याची पडझड रोखण्याचे आव्हान..नूतन प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना राज्याचा कारभार पाहावा लागेल. पक्षाची ताकद वाढवतानाच साताऱ्याचा ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करावा लागेल. कारण, जिल्ह्यात आज एकही पक्षाचा आमदार नाही. हे पाहता शिंदे यांना पक्षाला जिल्ह्यात पुन्हा ऊर्जितावस्था आणावी लागणार आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांनाही जेरीस आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तरच पक्षाला पुन्हा जिल्ह्यात स्थान मिळवता येईल.

शरद पवार यांचे सूचक भाष्य ठरले खरे..राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २६ जून रोजी सातारा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद झाली. यावेळी शशिकांत शिंदे हे पवार यांच्या बाजूला बसले होते. पत्रकार परिषद सुरू होताच शिंदे हे उठून चालले होते; पण पवार यांनी हात खांद्यावर ठेवून बसविले, तसेच शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी कधी देणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, बघूया’ म्हणत त्यांनी सूचक स्मितहास्य केले. एक प्रकारे शिंदे यांच्या नावाला संमतीच दर्शविली होती.

दोन मतदारसंघांत दोन-दोन वेळा आमदार..शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना वेळोवेळी संधी दिली आहे. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शिंदे यांना पवार यांनी त्यावेळच्या जावळी विधानसभा मतदारसंघात संधी दिली. शिंदे हे पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले. त्यानंतर २००४ लाही विजयी झाले. मात्र, २००८ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे शरद पवार यांनी शिंदे यांना २००९ च्या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात उमेदवारी दिली. तेथे शिंदे यांनी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचा पराभव केला. २०१४ लाही विजय मिळवला; पण २०१९ पासून दोन पराभव कोरेगाव मतदासंघात शिंदे यांना स्वीकारावे लागले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत शिंदे यांचा खासदार उदयनराजे यांच्या विरोधात निसटता पराभव झाला.