शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजयाचा उन्माद.. पराजयाचा सुडाग्नी !

By admin | Updated: January 23, 2016 00:54 IST

बॅँकेची प्रतिष्ठा टिकवा : ‘जयाभाव’च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे न लढताच युध्द जिंकले..

सातारा : बँकेच्या एका संचालकाला केवळ इतिवृत्त अन् सभेच्या नोटिसा व्यवस्थित मिळत नाहीत, या कारणावरून अवघा जिल्हा तब्बल ७६ तास ‘उपोषण’ नामक घटनेच्या दावणीला बांधला गेलेला. सुरुवातीला एका आमदाराला अत्यंत किरकोळीत काढू पाहणारी ‘बलाढ्य’ नेतेमंडळीही अखेर सपशेल झुकलेली. यामुळं ‘आपण चमत्कार घडविला?’ या मानसिकतेत ‘जयाभाव’च्या आंदोलनकर्त्यांनी ‘विजयाचा उन्माद’ करण्याची गरज नाही की, ‘चॅलेंज देणाऱ्यांना संपवा !’ असा ‘पराभवाचा सुडाग्नी’ही सत्ताधाऱ्यांनी धगधगत ठेवण्याची गरज नाही. नेत्यांच्या साठमारीत एक चांगली संस्था कामी येऊ नये, हीच तमाम सातारकरांची इच्छा; कारण ही बँक ना ‘गोरें’ची आहे, ना कोण्या ‘राजें’ची. ही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे!‘मनी, मसल अन् मॅन’ या तीन ‘एम’ पॉवरवर जिल्ह््यात नेहमीच धुरळा उडवून लावणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे ‘जयाभाव’. आजपर्यंत नेहमीच ‘लाखो अन् कोट्यवधीं’च्या शब्दात रमणाऱ्या या ‘जयाभाव’ना चार दिवसांपूर्वी चक्क ‘हजारे’ बनण्याची हुक्की आली. होय. ‘अण्णा हजारें’ सारखंच कार्यकर्त्यांनाही ‘मी जयाभाव समर्थक’ टोप्या चढवून ‘डीसीसी ’समोर ते उपोषणाला बसले. ‘डोक्यावर टोपी’ अन् ‘गळ्यात मफलर’ अशा ‘केजरीवाल’ स्टाईलनं ‘जयाभाव’ची दाढी वाढू लागली. मात्र, सत्ताधारी मंडळी उपोषणाच्या मंडपाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असली तरी प्रशासन मात्र संकटात सापडलेलं. कारण ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात उपोषण करणाऱ्या ‘काँग्रेस’च्या आमदाराला जर चुकून काही झालं असतं तर ‘भाजप-सेना’सरकारमधील अधिकाऱ्यांची पुरती वाट लागली असती. ‘वातावरणनिर्मिती’ अन् समोरच्यांवर ‘दबाव’ या दोन पॉइंटवर ‘जयाभाव’नी उपोषणाच्या ‘इव्हेंट’चं मॅनेजमेंट खूप छान राबविलेलं. कोणत्या कार्यकर्त्याला ‘कधी अन् कुठून साताऱ्यात आणायचं,’ याचं नियोजनही ग्रेट होतं. तसंच काही नेत्यांनाही या आंदोलनात उतरविण्याचं त्यांचं ‘टायमिंग’ही परफेक्ट होतं. मात्र, याचवेळी आपण आपल्या तालुक्यातला नेहमीचा राजकीय कलगीतुरा रंगवत नसून लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा एका आर्थिक बँकेच्या प्रतिमेचा ‘बभ्रा’ही करतोय, याची जाणीवही ठेवणं गरजेचं होतं. उपोषण सोडतानाही त्यांनी भविष्यातल्या आंदोलनाची भीती दाखविण्याचा आततायीपणा का केला, अशीही शंका अनेकांनी व्यक्त केली, ती यामुळेच. ९९ टक्के समाजकारण असणाऱ्या बँकेला राजकारणाचा अड्डा न बनविण्याची काळजीही त्यांना यापुढं घ्यावीच लागणार; कारण सांगली अन् कोल्हापूर जिल्हा बँकांसारखा प्रसंग इथंही यायला वेळ लागणार नाही. खरंतर, यात ‘जयाभाव’ही दोषी नाहीत; कारण सहकारातली सत्ता काबीज करण्याची ‘ट्रीक’ त्यांना सापडलीय; परंतु संस्था टिकविण्याचं ‘कसब’ अद्याप त्यांना गवसलेलं नाही.