शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

खटाव तालुक्यात गारा : झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडित

सातारा : सातारा शहरासह कऱ्हाड, पाटण, खटाव, माण तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी रस्त्यावर शेकडो झाडे उन्मळून पडली असून, शहरातील फलक पडले आहेत. काहीकाळ विद्युतपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सातारा शहरात शनिवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. रात्री सातच्या सुमारास प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. वादळी वाऱ्याबरोबरच वातावरणात धुळीचे कण उडत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे समोरचे काही न दिसल्याने राजपथ, खालच्या रस्त्यावर मोटारसायकली एकमेकांवर आदळल्या. जाहिरातींचे फलक रस्त्यावर पडले होते. त्यामुळे सुमारे अर्धा तास वीजपुरवठा खंडित केला होता. कऱ्हाड शहरातही अचानक काळे ढग जमा झाले अन् वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळेतच रस्ते सामसूम झाले. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील शेकडो झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जावळी, वाई, खटाव, फलटण तालुक्यांतही पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सर्व भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. (प्रतिनिधी)