शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पांढरेपाणीला आशेचा किरण दिसणार की नाही?

By admin | Updated: October 12, 2015 00:30 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : परिसरातील गावांचे पुनर्वसन; पांढरेपाणीकडे मात्र अजूनही दुर्लक्ष

पाटण : दिवस असो की रात्र, कधीही जंगली प्राणी घरात घुसतात. अशा भयावह स्थितीत जीवन जगणाऱ्या पांढरेपाणी या पाटण तालुक्यातील गावाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रात समावेश आहे. या गावालगतच्या मळे-कोळणे, पाथरपूंज आदी गावांचे नुकतेच पुनर्वसन म्हणून घोषित झाल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी जाहीर केले. मात्र आमदारांना शंभर टक्के मतदान करणाऱ्या पांढरेपाणीकरांचा विचार होईल, असे दिसत नाही. मग त्यांच्यासाठी आशेचा किरण कधी उजाडणार? असा सवाल व्यक्त होत आहे.चांदोली अभयारण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पांढरेपाणी ही वस्ती वसलेली आहे. या गावातील लोकांची उभी हयात जंगलातील प्राण्यांचा सामना करण्यात गेली. १९८५ दरम्यान पांढरेपाणी गावालगतची गावे उठविण्यात आली आणि अभयारण्य करण्यात आले. त्यावेळी पांढरेपाणीकरांची कुणी गांभीर्याने दखल घेतली नाही. तेव्हापासून आजपर्यंत चांदोली अभयारण्यातील वन्यप्राण्यांचा जीवघेणा त्रास हे लोक सहन करत आहेत. अनेकजण दगावले तर शेकडो मेंढ्या व पाळीव जनावरे जिवाला मुकली. त्यानंतर या गावच्या शेजारील मळे-कोळणे, पाथंरपूंज या गावांचे पुनर्वसन करण्याच्या घोषणा झाल्या. त्यामुळे आता तर पांढरेपाणीकरांच्या मानगुटीवरील फास अधिकच आवळला गेला आहे. एकटे गाव आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांच्या तावडीत सापडले आहे. या गावाला कुणी वाली दिसत नाही. विभागातील लोकप्रतिनिधी पांढरेपाणी गावच्या पुनर्वसनाबाबत कधी चकार शब्द काढताना दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यकाळात पांढरेपाणी गावातील जनतेचे काय हाल होणार, हे कोण जाणे? (प्रतिनिधी)पांढरेपाणी गावाचे पुनर्वसन करावेच लागणार आहे. हे तालुक्याच्या आजी-माजी आमदारांना चांगलेच ठाऊक आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा पांढरेपाणीकर कसे जीवन जगतात, हे अगदी जवळून पाहतात. अनेक वर्षांपासूनची आमची पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. मात्र याची दखल का घेतली जात नाही? हेच समजून येत नाही.-रामचंद्र शेळकेमाजी ग्रामपंचायत सदस्य, पांढरेपाणी प्रत्यक्ष गावात जा, म्हणजे समजेल... पांढरेपाणी गावात प्रत्यक्ष जाऊन तेथील लोकांच्या भावना ऐकून घेतल्या तर आणि जंगलाचा वेढा गावाला कसा पडला आहे, हे दिसेल. त्याहीपुढे जाऊन फक्त एकच रात्र त्या लोकांबरोबर सहवास करायचा तरंच शासनाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना व्यथा कळतील.