शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सातारा: ढेबेवाडी विभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:12 IST

वनविभागाला जाग कधी येणार, अशी शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया

कऱ्हाड : ढेबेवाडी विभागात रानडुकरांनी व गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. ऊस पिकासह भुईमूग, भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत.ढेबेवाडी विभाग डोंगरी व जंगलाने व्यापलेला आहे. गत आठ-दहा वर्षांत येथे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी रानडुकरांसह गव्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रानडुकरांनी काळगाव, उमरकांचन, सणबूर, सळवे परिसरात उच्छाद माजविला आहे. जानुगडेवाडी, बनपुरी, सळवे व बाचोली याठिकाणी रानडुकरांनी नुकसान केले आहे. रानडुकरांचे कळप रात्री शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहेत.तर निवी, कसणी, वरचे घोटील, कारळे, सातर, तामिणे व पानेरी या गावांना जंगल लागूनच असल्याने रानडुकरांबरोबरच, गवे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. मात्र, वनविभागाचे कर्मचारी सुस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करून आपली जबाबदारी झटकत आहेत. वनविभागाला जाग कधी येणार, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेनावनविभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा टाळाटाळ करण्यात धन्यता मानत आहेत. पंचनामे करून आपला फायदा नाही, अशी मानसिकता या वन कर्मचाऱ्यांची झाली आहे. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी