शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

Satara News: आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात वणवा, चार एकरातील वनसंपदा जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:11 IST

प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला

माणिक डोंगरेमलकापूर : आगाशिव डोंगरावरील लेण्यांच्या परिसरात अज्ञात समाजकंटकांनी भर उन्हात वणवा लावला. यात चार एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. उन्हामुळे वणवा वेगाने पसरू लागला. यावेळी प्रसंगावधान राखत वन अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी वणवा विझवला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला.आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात अचानक वणवा लागल्याचे जवळच शेतात काम करत असलेल्या कृषिभूषण प्राध्यापक संजय थोरात यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. पण वणवा अधिकच रौद्ररूप धारण करू लागला. त्यामुळे त्यांनी जखिणवाडी गावातील लक्ष्मण पवार व इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. शेतीमित्र अशोकराव थोरात व त्यांचे सहकारी बाबर, सागर पवार यांच्यासह वन विभागाचे आनंद जगताप, वनपाल हनुमंत मिठारे, अमोल माने, भरत पवार, आत्माराम काळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून चार, साडेचार एकरात डोंगरमाथ्यावर पसरलेला वणवा प्रयत्नांची पराकाष्ठा करून विझवला. यासाठी हवेचे मशीन, झाडांच्या फांद्या आदींचा वापर करून जवळपास तीन तास अथक प्रयत्न सुरू होते. या वणव्यामध्ये डोंगर उतारावरील व कड्यातील गवत, छोटे पक्षी, सरपटणारे जीव, कीटक व प्राणी जळून खाक झाले. आगाशिव डोंगराला लागलेला हा पहिलाच वणवा आहे. जखिणवाडी, नांदलापूर, मुनावळे, धोंडेवाडी, विंग, चचेगाव, आगाशिवनगर, कोयना वसाहत इथल्या निसर्गप्रेमींनी फावल्या वेळेत या वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे. वणवा लावणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध होईल, अशा पद्धतीने काम केले पाहिजे. वन विभाग व त्यांचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी यावेळी केले.

पावसाळ्यात लावलेल्या रोपांची राखरांगोळीआगाशिव डोंगरावर पुरातन संपत्ती आहे. ती नष्ट होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात प्रयत्नपूर्वक लावलेली रोपे व बीजारोपण, बीज गोळे या माध्यमातून उगवलेल्या छोट्या रोपांची या वणव्यात राखरांगोळी झाली आहे.

वणव्यामुळेच पर्यावरणाची हानी होते. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. पृथ्वीवर येणाऱ्या संकटाने कोट्यवधी वन्यजीव व लोक प्रभावित होतात. अविचाराने हवा, पाणी, जंगल, जमीन यांची मानवाने हानी केल्याने हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे आगाशिव येथे पायऱ्यांवरून जाणारे-येणारे पर्यटक व लेण्यांना भेट देणाऱ्यांनी वणवा लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. - तुषार नवले, वन अधिकारी कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग