शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

Satara News: आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात वणवा, चार एकरातील वनसंपदा जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:11 IST

प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला

माणिक डोंगरेमलकापूर : आगाशिव डोंगरावरील लेण्यांच्या परिसरात अज्ञात समाजकंटकांनी भर उन्हात वणवा लावला. यात चार एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. उन्हामुळे वणवा वेगाने पसरू लागला. यावेळी प्रसंगावधान राखत वन अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी वणवा विझवला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला.आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात अचानक वणवा लागल्याचे जवळच शेतात काम करत असलेल्या कृषिभूषण प्राध्यापक संजय थोरात यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. पण वणवा अधिकच रौद्ररूप धारण करू लागला. त्यामुळे त्यांनी जखिणवाडी गावातील लक्ष्मण पवार व इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. शेतीमित्र अशोकराव थोरात व त्यांचे सहकारी बाबर, सागर पवार यांच्यासह वन विभागाचे आनंद जगताप, वनपाल हनुमंत मिठारे, अमोल माने, भरत पवार, आत्माराम काळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून चार, साडेचार एकरात डोंगरमाथ्यावर पसरलेला वणवा प्रयत्नांची पराकाष्ठा करून विझवला. यासाठी हवेचे मशीन, झाडांच्या फांद्या आदींचा वापर करून जवळपास तीन तास अथक प्रयत्न सुरू होते. या वणव्यामध्ये डोंगर उतारावरील व कड्यातील गवत, छोटे पक्षी, सरपटणारे जीव, कीटक व प्राणी जळून खाक झाले. आगाशिव डोंगराला लागलेला हा पहिलाच वणवा आहे. जखिणवाडी, नांदलापूर, मुनावळे, धोंडेवाडी, विंग, चचेगाव, आगाशिवनगर, कोयना वसाहत इथल्या निसर्गप्रेमींनी फावल्या वेळेत या वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे. वणवा लावणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध होईल, अशा पद्धतीने काम केले पाहिजे. वन विभाग व त्यांचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी यावेळी केले.

पावसाळ्यात लावलेल्या रोपांची राखरांगोळीआगाशिव डोंगरावर पुरातन संपत्ती आहे. ती नष्ट होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात प्रयत्नपूर्वक लावलेली रोपे व बीजारोपण, बीज गोळे या माध्यमातून उगवलेल्या छोट्या रोपांची या वणव्यात राखरांगोळी झाली आहे.

वणव्यामुळेच पर्यावरणाची हानी होते. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. पृथ्वीवर येणाऱ्या संकटाने कोट्यवधी वन्यजीव व लोक प्रभावित होतात. अविचाराने हवा, पाणी, जंगल, जमीन यांची मानवाने हानी केल्याने हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे आगाशिव येथे पायऱ्यांवरून जाणारे-येणारे पर्यटक व लेण्यांना भेट देणाऱ्यांनी वणवा लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. - तुषार नवले, वन अधिकारी कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग