शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘ब्रेक द चेन’ पण तोडणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:39 AM

सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे ...

सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे नाव घेईना. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले. एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडतेय तर दुसरीकडे नागरिक संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरताहेत, अशी टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, ही आशाही आता फोल ठरू लागली आहे. कोरोनाचे दररोज दोन ते अडीच हजार नवे रुग्ण व सरासरी चाळीस रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे. सद्यस्थितीला सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या तालुक्यांत कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पडू लागले आहेत.

गतवर्षी स्थानिक प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. यामध्ये अंगणवाडी सेविका, शिक्षक, पालिका कर्मचारी आदींच्या समावेश होता. ही पथके गृहभेटीद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करत होती. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झाले नाही. गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात होता. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांनी गावबंदी केली आहे. जिल्हाबंदी असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच अशा व्यक्तीची ना कोणती तपासणी केली जाते, ना कोणत्या नोंदी ठेवल्या जातात. स्वच्छता, निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती अशा बाबींचादेखील प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते.

एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडत असताना, दुसरीकडे नागरिकही शासन नियमांचे पालन करत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. प्रशासन व नागरिकांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढली, ती पाहता जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

(चौकट)

यामुळे वाढतेय संक्रमण

१. अत्यावश्यक सेवांना वेळेचे बंधन असले तरी अनेक दुकानदार शटर बंद करून दिवसभर सेवा पुरवत आहेत.

२. त्यामुळे बाजारपेठेत नागरिक, वाहनधारकांची दिवसभर रेचलेच सुरू असते. नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही.

३. जिल्ह्यात सध्याच्या घडीला तब्बल १८ हजार कोरोना रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. हे रुग्ण औषधोपचारसह कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत.

४. अशा रुग्णांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक संभवतो.

५. गतवर्षी प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. या माध्यमातून कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झालेले नाही.

६. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही.

७. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संंख्याही अधिक आहे. अशा व्यक्तींच्या नोंदी आता ठेवल्या जात नाहीत.