शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कुठे पळाले उरमोडीचे पाणी?

By admin | Updated: August 28, 2015 22:41 IST

शेखर गोरेंचा सवाल : धमक्यांना भीक न घालता कार्यकर्त्यांनी लढविली खिंड

म्हसवड : विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उरमोडीच्या पाण्याचे नाटक करून जनतेची दिशाभूल करून मते मिळविली. आता कुठे गेले उरमोडीचे पाणी? आता आठ दिवसांत उरमोडीचे पाणी आणणार होता. महिना उलटून गेला, कधी आणणार पाणी? असा प्रश्न उपस्थित करून हा बहाद्दर म्हणतो, शेखर गोरे आता तुरुंगात गेलाय त्याला मी दोन वर्षे बाहेर येऊ देणार नाही, तेव्हा आता तुम्हाला वाली कोण? माझ्या विरोधात ग्रामपंचायतीला पॅनेल टाकले तर बघून घेईन, अशा धमक्या दिल्या होत्या; परंतु कार्यकर्त्यांनी मी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलो असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीची खिंड लढविली व सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ती खिंड जिंकली,’ असे प्रतिपादन ‘रासप’चे शेखर गोरे यांनी केले.कुळकजाई, ता. माण येथे श्रीपालवन येथे शिंदी खुर्द, कुळकजाई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी किसनराव नलवडे, नागेश बर्गे, बाळासो कदम, अण्णासो कोळी, सोपान पवार, धनाजी कदम, अण्णासो जगदाळे, हणमंत मोहिते, बशीर मुलाणी, कुमार पोनेकर, अमर कुलकर्णी, शिवाजीराव घाडगे, डॉ. सुनील घाडगे, नामदेव शिंदे, दिलीप कदम, रजत मगर, वामनराव कदम, जोतिराम पवार, विठ्ठल जाधव, नामदेव चव्हाण, बापूराव नलवडे, आबासो जगदाळे, हणमंत पवार, महेश पोनेकर, अप्पासो बुधावले तसेच कुळकजाई पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ‘विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळेच मी नंबर दोनची मते मिळवू शकलो. त्यानंतर विकास सेवा सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवू शकलो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तात्यांना शब्द दिला होता, तो मी प्रामाणिकपणे पाळला; परंतु राष्ट्रवादीच्या कुटील कारस्थानामुळे व माण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील काही गद्दारांमुळे आमदार जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचे संचालक होऊ शकले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,’ असे आवाहनही यावेळी केले. (प्रतिनिधी)राजकारण सोडेन; पण जयकुमारसोबत नाहीज्यांच्या विरोधात आम्ही राजकारण लढत आहोत, त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, आणि तसा प्रसंग आला तर राजकारण सोडेन; पण युती करणार नाही, अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘माझा विरोधक नेमका कोण आहे, हे तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे युती होण्याचा प्रश्नच येत नाही. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असेल, याची मला कल्पना नव्हती. वेळप्रसंगी राजकारणातून संन्यास घेईन; पण लोकांच्या भावनांचा आदर करून घेईन.