शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:39 IST

मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना.

सातारा : ‘पावसाळा आला की मनात धस्स होतंय. सलग नऊ वर्षे वाडीच्या आजूबाजूनं भूस्खलन होतेय. यात आमची घरं कधी गुडूप होतील, हे सांगताही येणार नाही. यामुळं मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना. पावसाळ्यातील प्रत्येक रात्र आम्ही जागून काढतोय,’ हे हतबल झालेले उद्गार आहेत, पाटण तालुक्यातील सवारवाडीतील ग्रामस्थांचे.

पाटण तालुक्यातील तारळे भागातील कडवे बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत सवारवाडी हे गाव येते. ही वाडी डोंगरावर वसलेली आहे. तिला लागूनच भला मोठा कडा आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या कड्यामुळे गावकऱ्यांना चिंता लावणारी घटना घडली. कड्याच्या आजूबाजूने आणि गावच्या परिसरात भूस्खलन झाले. जमिनी खचल्या गेल्या. घरांना तडे गेले. या डोंगरावर इतक्या वर्षे गुण्यागोविंदाने राहणारे सवारवाडीतील ग्रामस्थ या भूस्खलनाने अक्षरश: हबकून गेले. प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी पाहणी दाैऱ्यात आल्यासारखे आले आणि निघून गेले, ते आजपर्यंत फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे सलग नऊ वर्षे सवारवाडीत भूस्खलन होतंय. त्यामुळे पावसाळा आला की ग्रामस्थांच्या मनात धडकी भरते. एखाद्या पावसाळ्यात होत्याचं नव्हतं होईल, अशी धास्तीही ग्रामस्थांना लागलीय.या मधल्या काळात ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी शासनदरबारी अनेकदा उंबरठे झिजवले. मात्र, निवेदन स्वीकारण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. २५ ते ३० घरांचा उंबरठा असलेल्या या सवारवाडीत सध्या भयभीत वातावरण आहे. आत्तापर्यंत भूस्खलन होऊन नऊ वर्षे झाली. त्यामुळे इथून पुढे वाडीवर कोणते संकट ओढवेल, या चिंतेने ग्रामस्थांनी आपल्या मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवले आहे; तर काहीजण साताऱ्यामध्ये येऊन राहिले आहेत. जिल्हा प्रशासनानं आमचं पुनर्वसन तातडीनं करावं, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. केवळ पावसाळा आला की, पुनर्वसनाची आठवण नको. आमच्या जिवाचा विचार करा, असं हतबल होऊन ग्रामस्थ सांगताहेत.

पाटणच्या तहसीलदारांना उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्रनिवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पाटणच्या तहसीलदारांना ६ सप्टेंबर २०२१ रोजी शासकीय पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सवारवाडी, पो. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा या वाडीचे भूस्खलन हे गेल्या नऊ वर्षांपासून होत आहे. वारंवार अर्ज-निवेदन देऊनही सवारवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थांचा अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जावर योग्य ती कार्यवाही करून या गावची स्थळपाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन