शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:39 IST

मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना.

सातारा : ‘पावसाळा आला की मनात धस्स होतंय. सलग नऊ वर्षे वाडीच्या आजूबाजूनं भूस्खलन होतेय. यात आमची घरं कधी गुडूप होतील, हे सांगताही येणार नाही. यामुळं मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना. पावसाळ्यातील प्रत्येक रात्र आम्ही जागून काढतोय,’ हे हतबल झालेले उद्गार आहेत, पाटण तालुक्यातील सवारवाडीतील ग्रामस्थांचे.

पाटण तालुक्यातील तारळे भागातील कडवे बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत सवारवाडी हे गाव येते. ही वाडी डोंगरावर वसलेली आहे. तिला लागूनच भला मोठा कडा आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या कड्यामुळे गावकऱ्यांना चिंता लावणारी घटना घडली. कड्याच्या आजूबाजूने आणि गावच्या परिसरात भूस्खलन झाले. जमिनी खचल्या गेल्या. घरांना तडे गेले. या डोंगरावर इतक्या वर्षे गुण्यागोविंदाने राहणारे सवारवाडीतील ग्रामस्थ या भूस्खलनाने अक्षरश: हबकून गेले. प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी पाहणी दाैऱ्यात आल्यासारखे आले आणि निघून गेले, ते आजपर्यंत फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे सलग नऊ वर्षे सवारवाडीत भूस्खलन होतंय. त्यामुळे पावसाळा आला की ग्रामस्थांच्या मनात धडकी भरते. एखाद्या पावसाळ्यात होत्याचं नव्हतं होईल, अशी धास्तीही ग्रामस्थांना लागलीय.या मधल्या काळात ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी शासनदरबारी अनेकदा उंबरठे झिजवले. मात्र, निवेदन स्वीकारण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. २५ ते ३० घरांचा उंबरठा असलेल्या या सवारवाडीत सध्या भयभीत वातावरण आहे. आत्तापर्यंत भूस्खलन होऊन नऊ वर्षे झाली. त्यामुळे इथून पुढे वाडीवर कोणते संकट ओढवेल, या चिंतेने ग्रामस्थांनी आपल्या मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवले आहे; तर काहीजण साताऱ्यामध्ये येऊन राहिले आहेत. जिल्हा प्रशासनानं आमचं पुनर्वसन तातडीनं करावं, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. केवळ पावसाळा आला की, पुनर्वसनाची आठवण नको. आमच्या जिवाचा विचार करा, असं हतबल होऊन ग्रामस्थ सांगताहेत.

पाटणच्या तहसीलदारांना उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्रनिवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पाटणच्या तहसीलदारांना ६ सप्टेंबर २०२१ रोजी शासकीय पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सवारवाडी, पो. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा या वाडीचे भूस्खलन हे गेल्या नऊ वर्षांपासून होत आहे. वारंवार अर्ज-निवेदन देऊनही सवारवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थांचा अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जावर योग्य ती कार्यवाही करून या गावची स्थळपाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन