शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:39 IST

मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना.

सातारा : ‘पावसाळा आला की मनात धस्स होतंय. सलग नऊ वर्षे वाडीच्या आजूबाजूनं भूस्खलन होतेय. यात आमची घरं कधी गुडूप होतील, हे सांगताही येणार नाही. यामुळं मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना. पावसाळ्यातील प्रत्येक रात्र आम्ही जागून काढतोय,’ हे हतबल झालेले उद्गार आहेत, पाटण तालुक्यातील सवारवाडीतील ग्रामस्थांचे.

पाटण तालुक्यातील तारळे भागातील कडवे बुद्रुक ग्रामपंचायतीअंतर्गत सवारवाडी हे गाव येते. ही वाडी डोंगरावर वसलेली आहे. तिला लागूनच भला मोठा कडा आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या कड्यामुळे गावकऱ्यांना चिंता लावणारी घटना घडली. कड्याच्या आजूबाजूने आणि गावच्या परिसरात भूस्खलन झाले. जमिनी खचल्या गेल्या. घरांना तडे गेले. या डोंगरावर इतक्या वर्षे गुण्यागोविंदाने राहणारे सवारवाडीतील ग्रामस्थ या भूस्खलनाने अक्षरश: हबकून गेले. प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी पाहणी दाैऱ्यात आल्यासारखे आले आणि निघून गेले, ते आजपर्यंत फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे सलग नऊ वर्षे सवारवाडीत भूस्खलन होतंय. त्यामुळे पावसाळा आला की ग्रामस्थांच्या मनात धडकी भरते. एखाद्या पावसाळ्यात होत्याचं नव्हतं होईल, अशी धास्तीही ग्रामस्थांना लागलीय.या मधल्या काळात ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी शासनदरबारी अनेकदा उंबरठे झिजवले. मात्र, निवेदन स्वीकारण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत. २५ ते ३० घरांचा उंबरठा असलेल्या या सवारवाडीत सध्या भयभीत वातावरण आहे. आत्तापर्यंत भूस्खलन होऊन नऊ वर्षे झाली. त्यामुळे इथून पुढे वाडीवर कोणते संकट ओढवेल, या चिंतेने ग्रामस्थांनी आपल्या मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवले आहे; तर काहीजण साताऱ्यामध्ये येऊन राहिले आहेत. जिल्हा प्रशासनानं आमचं पुनर्वसन तातडीनं करावं, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. केवळ पावसाळा आला की, पुनर्वसनाची आठवण नको. आमच्या जिवाचा विचार करा, असं हतबल होऊन ग्रामस्थ सांगताहेत.

पाटणच्या तहसीलदारांना उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्रनिवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पाटणच्या तहसीलदारांना ६ सप्टेंबर २०२१ रोजी शासकीय पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सवारवाडी, पो. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा या वाडीचे भूस्खलन हे गेल्या नऊ वर्षांपासून होत आहे. वारंवार अर्ज-निवेदन देऊनही सवारवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले नाही. पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थांचा अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जावर योग्य ती कार्यवाही करून या गावची स्थळपाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन