शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

तरी बरे.. सदस्यच आक्रमक झाले!

By admin | Updated: November 25, 2015 00:42 IST

कायद्यावर बोट : १३ आॅगस्टलाच मिळाले होते परिपत्रक--नियोजन आखाडा-दोन

सागर गुजर -- सातारानियोजन आराखड्यासोबत कायद्याने कामांच्या याद्या जोडणे बंधनकारक करण्यासाठी लोकप्रतिनिधी आक्रमक झाले, हे एका अर्थाने बरेच झाले. आता किमान मागील इतिहासानुसार आराखडा मंजुरीचा शिरस्ता मोडीत निघण्यास मदत झाली आहे. आता सर्व काही कायद्याने होईल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे; पण याआधी सगळे बेकायदा झाले का?, असाही सवाल विचारला जात आहे.पुढील वर्षाचा नियोजन आराखडा चालू वर्षाच्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मंजूर करायचा आणि नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात नियोजन बैठक घेऊन मंजूर आराखडा कामांच्या याद्यांसोबत जोडून तो शासनाला पाठवायचा, असे कामकाज यापूर्वीपर्यंत सुरू होते. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीत सध्या असणाऱ्या सदस्यांपैकीच बहुतांश सदस्य याआधीचे नियोजन आराखडे मंजूर करण्यासाठी उपस्थित होते. पण कामांच्या याद्यांचा मुद्दा तेव्हा जेवढा चर्चेला आला नव्हता, तो नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी आला. हा मुद्दा चर्चेला आणण्यामागे जसे राजकीय डावपेच आहेत, तसेच ते कायद्याच्या बाजूने योग्य ठरले आहे. राज्य शासनाने १३ आॅगस्ट २0१५ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार विकासकामांमध्ये वित्तीय शिस्त आणण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. या परिपत्रकानुसार नियोजन आराखड्यासोबत कामांच्या याद्या देणे बंधनकारक केले गेले आहे. कुठल्या कामासाठी किती मंजूर झाला आहे, हे या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. दरम्यान, परिपत्रकाची माहितीच जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती काय?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. नियोजन आराखडा बैठकीसाठी ३0 आॅगस्टपर्यंत नियोजन समितीच्या सदस्यांनी कामांच्या याद्या देणे आवश्यक होते. या याद्या अनेक जणांनी दिल्याच नाहीत. त्यामुळे ऐन नियोजन समितीच्या बैठकीआधी याद्यांचा मुद्दा बाजूला गेला. वास्तविक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या कामांच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून येतात, त्याठिकाणी ठराव मंजूर व्हावा लागतो. आता पुन्हा ४ डिसेंबर रोजी नियोजन समितीची बैठक होणार असल्याने इतक्या कमी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठका आयोजित करून ठराव होणे कठीण झाले आहे. त्यामुळे नियोजन विभागाला याद्या पाठवून देऊन नंतर त्याला मंजुरी देण्याचा मार्ग काढावा लागणार आहे.जिल्हा नियोजन आराखडा बैठकीवेळी याद्या सादर न करणाऱ्या विभागांवर कारवाई करण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाले की शहानिशा करून नक्की कुणाकडून कामचुकारपणा झाला, हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- नितीन पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदराज्य शासनाने वित्तिय शिस्तीसाठी घालून दिलेल्या धोरणांप्रमाणे नियोजन आराखड्यासोबत याद्या जोडणे गरजेचेच होेते. नियोजन विभागाने ४ ते ५ वेळा संबंधित खात्यांना याद्या देण्याचे स्मरण केले होते. पण तरीही याद्या प्राप्त झालेल्या नव्हत्या. त्यामुळे कारवाई करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाने सूचना केल्या आहेत.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी