शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

जिल्ह्याच्या सीमेवरच खड्ड्याने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:22 IST

मायणी : सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर ...

मायणी : सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतानाच जिल्ह्याच्या सीमेवरील खड्ड्यात प्रवाशांचे स्वागत होत आहे. मात्र, तिन्ही जिल्ह्यांतून जाणाऱ्या या राज्य मार्गाला वेगवेगळे नियम कसे, असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली सातारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा मिरज-भिगवन हा राज्य मार्ग आहे. या मार्गावरून बारामती, अहमदनगर, सांगली या महत्त्वपूर्ण बाजारपेठा जोडलेल्या आहेत. त्यामुळे रोज शेकडो वाहने या मार्गावरून धावत असतात. मात्र, वाहनांचे नुकसान होत आहे. वाहन चालक पर्यायी मार्गाचा शोध घेत असल्याने वेळ व पैसा अधिक खर्च होत आहे.

राज्यमार्गावरील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाहतूक व देशातील दक्षिण उत्तर राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण राज्यमार्ग असल्याने, हा राज्यमार्ग केंद्राने स्वतःच्या ताब्यात घेतला. हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याची चर्चा तीन, चार वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावर डागडुजी सोडले, तर इतर कोणताही मोठा खर्च टाकत नसल्याने, अनेक वर्षांपासून हा राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

राज्य मार्गावरील जिल्हा हद्द, मायणी ते दहिवडी या सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तर सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतानाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा व प्रवाशांचे स्वागत खड्ड्यातच होत आहे. मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मिरज-भिगवण राज्यमार्ग सांगली सातारा व पुणे जिल्ह्यातून जात आहे. या मार्गावरील सांगली जिल्ह्यातील रस्त्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे, तर नुकताच दोन महिन्यांपूर्वी मायणी ते विटा हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण व सील कोट टाकून पूर्ण केला आहे. फलटण-बारामती हा रस्ताही चांगल्या दर्जाचा आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील मायणी, दहिवडी ते मोगराळे घाट हा सुमारे साठ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला आहे.

चौकट

मायणी-दहिवडी राज्य मार्गावर चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. प्रत्येक वर्षी त्याच त्याच खड्ड्यांवर शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे, तरीही एक-दोन महिन्यांत हे खड्डे पुन्हा स्वतःचे अस्तित्व दाखवत आहेत. त्यामुळे हा राज्यमार्ग संपूर्ण नव्याने होणे गरजेचे आहे.

२९मायणी-रोड

सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात मायणीजवळ प्रवेश करताना, याच खड्ड्यात प्रवाशांचे स्वागत होत आहे. (छाया : संदीप कुंभार)