शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:50 IST

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं.

पाचगणी : ‘यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात त्यांनी आपला पक्ष वाढवला; पण ४० वर्षे पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं, हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे. सर्व विकासकेंद्रे बारामतीला नेली, औंधचं संस्थानही त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांनी दिलं काय ? आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी केला. भिलार, ता. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला ती मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आपण बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार यासाठी काम सुरू आहे.’‘पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे ?  त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादी बरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची मानसिकता असायला पाहिजे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता ? असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्यावं. मी लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं ?  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा मिळते. प्रत्येक संकटाच्या वेळी फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक परिस्थितीत मजबुतीने पाठीशी उभा राहणारा भाजप पक्ष आहे, असेही जिल्हाध्यक्ष गोरे यांनी स्पष्ट केले.  यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. या शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 

सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं...दोन दिवसांच्या या शिबिरातून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  कामाला लागावे. आगामी काळात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याबरोबरच जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात. फलटणकरांनी कायम बारामतीकरांशी गोड बोलून सत्तेची भूक भागवली; पण त्यांच्या सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं, हे पाप फलटणकरांनी जिल्ह्याच्या माथी मारलं, असे गोरे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार