शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:35 PM

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रियापाकिस्तानचा निषेध; फटाके फोडले, साखर अन् पेढे वाटून आनंदोत्सव

सातारा : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकमधील हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. हवाई दलाच्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त साताऱ्यात धडकताच नागरिकांनी मोती चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.मोती चौकात शेकडोच्या संख्येने एकत्र येत सातारकरांनी फटाके वाजविले. तसेच साखर अन् पेढे वाटण्यात आले. रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, दुकानदार, सातारकर नागरिकांना पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, नगरसेवक विजय काटवटे, किशोर पंडित, नगरसेविका आशा पंडित, किशोर गोडबोले, सुनील काळेकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार म्हणाले, ह्य१४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करून ४० जणांना ठार केले होते. त्यामुळे भारतीयांच्या मनात दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यामध्ये ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. तुम्ही आमचे ४० मारले; पण आम्ही ४०० मारू, हेच भारताने आता दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSatara areaसातारा परिसर