शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हालाही पाकिस्तानशी लढायचंय", माजी सैनिक सरसावले, संरक्षणमंत्र्यांना पाठविले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:43 IST

Indian Army News: पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग जमू लागल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माजी नौदल सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा हाती शस्त्रे घेण्याची तयारी ठेवली आहे.

सातारा - पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग जमू लागल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माजी नौदल सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा हाती शस्त्रे घेण्याची तयारी ठेवली आहे. केंद्र सरकारने आवाहन केल्यास आम्ही कोणत्याही आवाहनासाठी सज्ज असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संरक्षणमंत्र्यांना दिले आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्याला सरसेनपती हंबीरराव मोहिते ते दिवंगत कर्नल संतोष महाडिकपर्यंतचा लष्करी वारसा आहे. जिल्ह्यातील सैनिकांनी दोन्ही जागतिक महायुद्धांमध्ये तसेच स्वातंत्र्योत्तर युद्धात सहभाग घेतला आहे. या जिल्ह्यात अधिकारी, सैनिक, खलाशी आणि एअरमन आहेत. पहलगामच्या भ्याड हल्ल्यामुळे सध्या असलेली परिस्थिती आम्हाला माहीत आहे. त्यामुळे सरकारने दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवण्याचा निर्णय घेतला, तर जिल्ह्यातील ५०० आणि देशातील इतर भागातील आमचे माजी नौसैनिक भारतीय नौदलाला मदत करण्यास उत्सुक आहेत. वयामुळे मर्यादा असल्या तरी आमचा अनुभव युद्ध आघाडीवर मदत करेल. सरकार किंवा भारतीय नोदलाच्या कोणत्याही आवाहनासाठी सज्ज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSatara areaसातारा परिसर