शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा पाणीसाठा..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: October 9, 2023 18:31 IST

पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार 

सातारा : मान्सून परतला असून यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्केही भरलेली नाहीत. त्यातच पूर्व भागातही एकदम कमी पाऊस झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे. पूर्व भागात तर दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे. यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचणासाठीही पाण्याची तरतूद केलेली आहे. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे.पण, यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. परिणामी आहे त्या साठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

उरमोडीत अवघा ५८ टक्क्यांवर साठा..सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी धरणात ५.८३ टीएमसीच साठा झालेला आहे. ५८.५९ टक्के धरण भरलेले आहे. त्यातच या धरणातील पाण्यावर सातारा तालुक्याबरोबरच माण आणि खटाव तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. धरण भरले नसल्याने आवर्तनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोयनेत ९४ टीएमसी पाणी...राज्यातील मोठ्या धरणापैकी एक कोयना आहे. १०५.२५ टीएमसी धरण आहे. या धरणात ९३.९९ टीएमसीच पाणीसाठा झालेला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.३० इतके आहे. या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात येते. यंदा धरणात ११ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर योग्यरितीने करावा लागणार आहे.

येरळवाडीत शुन्य टक्के साठाखटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमत १.१५ टीमएसी आहे. पावसाअभावी धरणसाठा झालाच नाही. सध्या या धरणात ०.२७ टीएमसी म्हणजे शुन्य टक्के पाणीसाठा आहे. त्यातच या धरणात खटावमधील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून असतात. त्यामुळे पाणीटंचाई भासणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणे   गतवर्षी     यावर्षी   यंदाची टक्केवारी      एकूण क्षमता
धोम   १३.५०   १०.६८   ७९.०७   १३.५०
कण्हेर१०.०९   ८.१३ ८०.५३     १०.१०
कोयना १०४.६१  ९३.९९   ८९.३०   १०५.२५
बलकवडी ४.०८    ३.८१   ९३.५०   ४.०८
उरमोडी ९.९४   ५.८३   ५८.५९   ९.९६
तारळी ५.७३    ५.८३   ९५.६०   ५.८५

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी