शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती भयावह; एक लाख लोकांची तहान टॅंकरवर

By नितीन काळेल | Updated: November 24, 2023 18:45 IST

उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके थांबेनात

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके जून-जुलैमध्ये थांबतात. पण, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील ५ तालुक्यातील सुमारे १ लाख नागरिक आणि ६९ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. सध्या हिवाळ्यातच ६७ गावे आणि २६५ वाड्या तहानल्या असल्यातरी आगामी काळात टॅंकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाई सोडलीतर जुलै महिना उजाडताच टॅंकर बंद व्हायचे. यंदा मात्र, पावसाने घात केला. त्यामुळे टंचाईची स्थिती कायम आहे. विशेषत: करुन माण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील सहा महिन्यांपासून टॅंकरवरच अनेक गावांची तहान अवलंबून आहे.माण तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यातील ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ३५ टॅंकर सुरू असून त्यावर ४८ हाजर नागरिक आणि ५३ हजार जनावरांची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, ढाकणी, धुळदेव, कारखेल, वरकुटे - म्हसवड, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, पर्यंती, मार्डी, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांवर टॅंकर सुरू आहे.

खटाव तालुक्यातीलही ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी येथील सुमारे ५ हजार नागरिक आणि २ हजारांहून अधिक पशुधनाला टॅंकरचाच आधार आहे. तर फलटण तालुक्यात अजुनही १० गावे आणि २८ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड आदी गावांतील १२ हजार नागरिक आणि ११ हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यात तर १९ गावांतील ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकर सुरू आहे. वाई तालुक्यातीलही एका गावातील १२०० नागरिक आणि २८९ जनावरांना टॅंकरचा आधार आहे.

जिल्ह्यात ६१ टॅंकर सुरू..जिल्ह्यातील माण तालुक्यात टंचाईची स्थिती भयावह आहे. त्यात आणखी वाढ होत जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टॅंकरद्वारे लोकांना आणि पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय ११ आणि खासगी ५० टॅंकर आहेत. जानेवारीनंतर टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

विहिरी अन् बोअरवेलचेही अधिग्रहण..टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विहिरी आणि बोअरवलेचेही पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माणमध्ये ५ विहिरी, १० बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. खटाव तालुक्यात ३ विहिरी, २१ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ