शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Updated: June 13, 2023 17:03 IST

जिल्ह्यातील ५७ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार 

सातारा : मान्सूनच्या पावसाचे अजून दमदार आगमन झाले नसल्याने टंचाईस्थितीत दररोज वाढ होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील ४८ गावे आणि १७० वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ३४ टॅंकर सुरू आहेत. तर ५७ हजार नागरिक व साडे सात हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून टंचाईवरील खर्च कमी होत चालला आहे. यासाठी जलसंधारणाची कामे महत्वाची ठरली. तसेच पाऊसही वेळेवर आणि जोरदार झाला. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाला विलंब झाला आहे. त्यातच वळवाचे पाऊसही मोठ्या प्रमाणात झाले नाहीत. परिणामी मे महिन्यानंतर टंचाईची स्थिती अधिक वाढली. सध्या जून महिना मध्यावर आलातरी टंचाई निवारणासाठी टॅंकर धावू लागले आहेत. त्यातच विशेष म्हणजे मागील सहा दिवसांत जवळपास १५ नवीन गावे आणि ५० हून अधिक वाड्या टंचाईत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे प्रशासनालाही उपायोजना राबवाव्या लागत आहेत.

जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण वगळता इतर सर्व ९ तालुक्यात टॅंकर सुरू झाले आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे. या तालुक्यातील २८ गावे आणि १६१ वाड्यांतील ४२ हजार ४२६ नागरिकांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर २ हजार १३० पशुधनही टॅंकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या २० टॅंकर सुरु आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, भाटकी, खडकी, धुळदेव, भालवडी, खुटबाव, मार्डी, सुरुपखानवाडी, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाड्यांवर टंचाई आहे.खटाव तालुक्यात जायगाव आणि मांजरवाडी येथे टॅंकर सुरू आहे. यावर १ हजार ९६८ नागरिक आणि २०४ पशुधन अवलंबून आहे. तर या गावांसाठी १ टॅंकर सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात एकाच गावात टंचाई निर्माण झालेली आहे. तर वाई तालुक्यात ४ गावे आणि ३ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. मांढरदेव परिसरातील ही गावे आहेत. पाटण तालुक्यात एका वाडीत टंचाई आहे.जावळी तालुक्यातही २ गावे आणि १ वाडी टंचाईग्रस्त आहे. सायगाव आणि केळघर सर्कलमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस पडतो. पण, या तालुक्यातही आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वेळापूर आदींसह ६ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू आहे. सातारा तालुक्यातही टंचाई असून १ गाव आणि ३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्यात ५ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायकवाडवाडी, येवतीचा समावेश आहे.२४ विहिरी अधिग्रहण; खासगी ३२ टॅंकर...

टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण ३४ टॅंकर सुरू आहेत. त्यातील खासगी ३२ तर शासकीय २ टॅंकर आहेत. तर २४ विहिरी आणि २२ बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात ३ विहिरी आणि ६ बोअरचे अधिग्रहण झाले आहे. खटावला १, कोरेगाव २, वाई ५, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ३ आणि कऱ्हाड तालुक्यात ६ विहिरींचे अधिगग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी