शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Updated: June 13, 2023 17:03 IST

जिल्ह्यातील ५७ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार 

सातारा : मान्सूनच्या पावसाचे अजून दमदार आगमन झाले नसल्याने टंचाईस्थितीत दररोज वाढ होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील ४८ गावे आणि १७० वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ३४ टॅंकर सुरू आहेत. तर ५७ हजार नागरिक व साडे सात हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून टंचाईवरील खर्च कमी होत चालला आहे. यासाठी जलसंधारणाची कामे महत्वाची ठरली. तसेच पाऊसही वेळेवर आणि जोरदार झाला. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाला विलंब झाला आहे. त्यातच वळवाचे पाऊसही मोठ्या प्रमाणात झाले नाहीत. परिणामी मे महिन्यानंतर टंचाईची स्थिती अधिक वाढली. सध्या जून महिना मध्यावर आलातरी टंचाई निवारणासाठी टॅंकर धावू लागले आहेत. त्यातच विशेष म्हणजे मागील सहा दिवसांत जवळपास १५ नवीन गावे आणि ५० हून अधिक वाड्या टंचाईत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे प्रशासनालाही उपायोजना राबवाव्या लागत आहेत.

जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण वगळता इतर सर्व ९ तालुक्यात टॅंकर सुरू झाले आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे. या तालुक्यातील २८ गावे आणि १६१ वाड्यांतील ४२ हजार ४२६ नागरिकांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर २ हजार १३० पशुधनही टॅंकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या २० टॅंकर सुरु आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, भाटकी, खडकी, धुळदेव, भालवडी, खुटबाव, मार्डी, सुरुपखानवाडी, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाड्यांवर टंचाई आहे.खटाव तालुक्यात जायगाव आणि मांजरवाडी येथे टॅंकर सुरू आहे. यावर १ हजार ९६८ नागरिक आणि २०४ पशुधन अवलंबून आहे. तर या गावांसाठी १ टॅंकर सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात एकाच गावात टंचाई निर्माण झालेली आहे. तर वाई तालुक्यात ४ गावे आणि ३ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. मांढरदेव परिसरातील ही गावे आहेत. पाटण तालुक्यात एका वाडीत टंचाई आहे.जावळी तालुक्यातही २ गावे आणि १ वाडी टंचाईग्रस्त आहे. सायगाव आणि केळघर सर्कलमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस पडतो. पण, या तालुक्यातही आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वेळापूर आदींसह ६ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू आहे. सातारा तालुक्यातही टंचाई असून १ गाव आणि ३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्यात ५ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायकवाडवाडी, येवतीचा समावेश आहे.२४ विहिरी अधिग्रहण; खासगी ३२ टॅंकर...

टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण ३४ टॅंकर सुरू आहेत. त्यातील खासगी ३२ तर शासकीय २ टॅंकर आहेत. तर २४ विहिरी आणि २२ बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात ३ विहिरी आणि ६ बोअरचे अधिग्रहण झाले आहे. खटावला १, कोरेगाव २, वाई ५, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ३ आणि कऱ्हाड तालुक्यात ६ विहिरींचे अधिगग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी