शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

By नितीन काळेल | Updated: June 13, 2023 17:03 IST

जिल्ह्यातील ५७ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार 

सातारा : मान्सूनच्या पावसाचे अजून दमदार आगमन झाले नसल्याने टंचाईस्थितीत दररोज वाढ होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील ४८ गावे आणि १७० वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. यासाठी ३४ टॅंकर सुरू आहेत. तर ५७ हजार नागरिक व साडे सात हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून टंचाईवरील खर्च कमी होत चालला आहे. यासाठी जलसंधारणाची कामे महत्वाची ठरली. तसेच पाऊसही वेळेवर आणि जोरदार झाला. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाला विलंब झाला आहे. त्यातच वळवाचे पाऊसही मोठ्या प्रमाणात झाले नाहीत. परिणामी मे महिन्यानंतर टंचाईची स्थिती अधिक वाढली. सध्या जून महिना मध्यावर आलातरी टंचाई निवारणासाठी टॅंकर धावू लागले आहेत. त्यातच विशेष म्हणजे मागील सहा दिवसांत जवळपास १५ नवीन गावे आणि ५० हून अधिक वाड्या टंचाईत समाविष्ट झाल्या आहेत. यामुळे प्रशासनालाही उपायोजना राबवाव्या लागत आहेत.

जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण वगळता इतर सर्व ९ तालुक्यात टॅंकर सुरू झाले आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे. या तालुक्यातील २८ गावे आणि १६१ वाड्यांतील ४२ हजार ४२६ नागरिकांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर २ हजार १३० पशुधनही टॅंकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या २० टॅंकर सुरु आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, भाटकी, खडकी, धुळदेव, भालवडी, खुटबाव, मार्डी, सुरुपखानवाडी, विरळी आदी गावे आणि परिसरातील वाड्यांवर टंचाई आहे.खटाव तालुक्यात जायगाव आणि मांजरवाडी येथे टॅंकर सुरू आहे. यावर १ हजार ९६८ नागरिक आणि २०४ पशुधन अवलंबून आहे. तर या गावांसाठी १ टॅंकर सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात एकाच गावात टंचाई निर्माण झालेली आहे. तर वाई तालुक्यात ४ गावे आणि ३ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. मांढरदेव परिसरातील ही गावे आहेत. पाटण तालुक्यात एका वाडीत टंचाई आहे.जावळी तालुक्यातही २ गावे आणि १ वाडी टंचाईग्रस्त आहे. सायगाव आणि केळघर सर्कलमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस पडतो. पण, या तालुक्यातही आंब्रळ, भीमनगर, तापोळा, वेळापूर आदींसह ६ गावे आणि एका वाडीसाठी टॅंकर सुरू आहे. सातारा तालुक्यातही टंचाई असून १ गाव आणि ३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्यात ५ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायकवाडवाडी, येवतीचा समावेश आहे.२४ विहिरी अधिग्रहण; खासगी ३२ टॅंकर...

टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण ३४ टॅंकर सुरू आहेत. त्यातील खासगी ३२ तर शासकीय २ टॅंकर आहेत. तर २४ विहिरी आणि २२ बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात ३ विहिरी आणि ६ बोअरचे अधिग्रहण झाले आहे. खटावला १, कोरेगाव २, वाई ५, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ३ आणि कऱ्हाड तालुक्यात ६ विहिरींचे अधिगग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी