शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

साताऱ्यात ८२ गावे ४०४ वाड्यांत पाण्याचा ठणठणाट, पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार 

By नितीन काळेल | Updated: September 6, 2023 16:37 IST

जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस नाही

सातारा : पावसाळा संपत आलातरी अजुनही जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी ८६ टॅंकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.जिल्ह्यात २०१७-१८ साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास २०० हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील चार वर्षांत पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे टंचाईची स्थिती फारशी उद्भवली नाही. मार्च-एप्रिलमध्ये टॅंकर सुरु झालातरी जूनपर्यंत तो सुरू राह्याचा. मात्र, यंदा टंचाईची परिस्थिती गडद आहे. सप्टेंबर महिना सुरू झालातरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झालेला नाही. पूर्व भागात कायम प्रतीक्षा असून पश्चिमेकडेच बऱ्यापैकी पडला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे पाण्याची टंचाई नाही. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यात टंचाई वाढू लागली आहे.जिल्ह्यातील माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. एकूण ४७ गावे आणि ३४३ गावांना ६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरवर सुमारे ७५ हजार नागरिक आणि ६१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यात पांगरी, वडगाव, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटाबा, मार्डी, खुटबाव, पर्यंती, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाडी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांवर पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.खटाव तालुक्यातही टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे सध्या १९ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तालुक्यातील २६ हजार नागरिक आणि साडे सात हजार जनावरांना १२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी आदीं गावांसह इतर वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातही टंचाई आहे. ८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरवर १३ हजार ८२५ नागरिक आणि १४ हजारांवर जनावरांची तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टंचाई निवारणासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.तर कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई आहे. यासाठी ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई असून साडे तीन हजार नागरिक आणि २ हजार पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच वाई तालुक्यातही दोन गावांना टंचाईची समस्या आहे.

सव्वा लाख नागरिक; ८५ हजार पशुधन विळख्यात...जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे आज पाच तालुक्यातील १ लाख १९ हजार ६६० नागरिक आणि ८५ हजारांवर पशुधनाला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात आहे. टंचाई निवारणासाठी शासकीय ७ आणि खासगी ७७ टॅंकर सुरू आहेत. तर २० विहिरी आणि ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ