शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

साताऱ्यात ८२ गावे ४०४ वाड्यांत पाण्याचा ठणठणाट, पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार 

By नितीन काळेल | Updated: September 6, 2023 16:37 IST

जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस नाही

सातारा : पावसाळा संपत आलातरी अजुनही जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी ८६ टॅंकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.जिल्ह्यात २०१७-१८ साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास २०० हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील चार वर्षांत पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे टंचाईची स्थिती फारशी उद्भवली नाही. मार्च-एप्रिलमध्ये टॅंकर सुरु झालातरी जूनपर्यंत तो सुरू राह्याचा. मात्र, यंदा टंचाईची परिस्थिती गडद आहे. सप्टेंबर महिना सुरू झालातरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झालेला नाही. पूर्व भागात कायम प्रतीक्षा असून पश्चिमेकडेच बऱ्यापैकी पडला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे पाण्याची टंचाई नाही. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यात टंचाई वाढू लागली आहे.जिल्ह्यातील माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. एकूण ४७ गावे आणि ३४३ गावांना ६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरवर सुमारे ७५ हजार नागरिक आणि ६१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यात पांगरी, वडगाव, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटाबा, मार्डी, खुटबाव, पर्यंती, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाडी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांवर पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.खटाव तालुक्यातही टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे सध्या १९ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तालुक्यातील २६ हजार नागरिक आणि साडे सात हजार जनावरांना १२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी आदीं गावांसह इतर वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातही टंचाई आहे. ८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरवर १३ हजार ८२५ नागरिक आणि १४ हजारांवर जनावरांची तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टंचाई निवारणासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.तर कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई आहे. यासाठी ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई असून साडे तीन हजार नागरिक आणि २ हजार पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच वाई तालुक्यातही दोन गावांना टंचाईची समस्या आहे.

सव्वा लाख नागरिक; ८५ हजार पशुधन विळख्यात...जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे आज पाच तालुक्यातील १ लाख १९ हजार ६६० नागरिक आणि ८५ हजारांवर पशुधनाला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात आहे. टंचाई निवारणासाठी शासकीय ७ आणि खासगी ७७ टॅंकर सुरू आहेत. तर २० विहिरी आणि ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ