शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

एका महिन्यात ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत -: सातारा पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:08 IST

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.

ठळक मुद्दे पाणीकपातीमुळे मिटली पुढील २८ दिवसांची चिंता

सचिन काकडे ।सातारा : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. पाण्याची दैनंदिन गरज पाहता पुढील २८ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंताही आता मिटली आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू झाल्यापासून कास तलावाची पाणीपातळी झपाट्याने खालावू लागली आहे. सध्या तलावात केवळ तीन ते चार फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता नगराध्यक्षा माधवी कदम व पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या उपस्थितीत पालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला.

दि. १० मे पासून या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, नागरिकांनही पाण्याचे महत्त्व ओळखूून पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले. दि. १० जून रोजी पाणीकपातीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला. कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभ भरले जातात. या जलकुंभाद्वारे शहराला नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभाची साठवण क्षमता वेगवेगळी आहे. कपातीच्या काळात प्रत्येक टाकीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात आला. त्यामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.

अशी झाली बचत...कासमधून प्रतिदिन ५ लाख ५० हजार लिटर तर शहापूरच्या माध्यमातून ७ लाख ५० हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच शहराला दररोज १३ लाख लिटर पाण्याची गरज भासते. एका महिन्यात ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाल्याने पाऊस जरी लांबणीवर गेला तरी शहराला पुढील २८ दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो.

टाकीचे नाव झालेली पाणीबचत(१० मे ते १० जून)बुधवार नाका टाकी, पॉवर हाऊस ६० लाख लिटरयशवंत टाकी (पहिला झोन) खापरी लाईन ४२ लाख लिटरयशवंत टाकी (दुसरा झोन) पावर हाऊस मेन लाईन ४४ लाख लिटरभैरोबा टाकी, राजवाडा टाकी, पंपिंग लाईन ४८ लाख लिटरव्यंकटपुरा टाकी, घोरपडे टाकी (सकाळ सत्र) ४० लाख लिटरकोटेश्वर टाकी, घोरपडे टाकी (दुपार सत्र) ५६ लाख लिटरकात्रेवाडा टाकी, गणेश टाकी, गुरुवार टाकी ६८ लाख लिटरएकूण बचत ३ कोटी ५८ लाख लिटर

खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली. टंचाई काळात सहकार्य केल्याने नागरिकांचेही कौतुक करायला हवे. कास व उरमोडी धरणात समाधानकारक साठा होईपर्यंत पाणीकपात सुरू राहणार आहे.- श्रीकांत आंबेकर,पाणीपुरवठा सभापती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी