शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात जलक्रांती; तलाव भरले तुडुंब...

By admin | Updated: September 26, 2016 00:13 IST

हरितक्रांतीचे बीज रोवले : ‘जलयुक्त’च्या कामामुळे शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी; गावोगावची पाणीटंचाई दूर

खंडाळा : तालुक्यात दरवर्षी गावोगावी जाणवणारी भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून भरीव काम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात झालेल्या पावसाने सर्वच ठिकाणचे तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. लोकसहभाग, जलयुक्त योजनेतील कामाने तालुक्यात जलक्रांती झाली असून, त्या माध्यमातून शेती पाण्याचाही प्रश्न मार्गी लागल्याने हरितक्रांतीचे बीज रोवले गेले आहे. खंडाळा तालुक्यातील विविध गावांना गेल्यावर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते. त्यामुळे पुढील काळात अशी पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत लोकसहभागातून धरणे, तलाव, बंधारे यातील गाळ काढून खोलीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली होती. तालुक्यातील खेड बु।। येथील तुळशी वृंदावन धरणासह, कण्हेरी, बावडा, म्हावशी, धावडवाडी, विंग, अजनूज, भादे, घाटदरे, हरळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम केले गेले. तर काही गावांमध्ये नवीन बंधारे लोकसहभागातून बांधले गेले. तसेच शासनाच्या लघुपाटबंधारे विभागातून सिमेंट बंधारेही बनविण्यात आल्याचे जलसंधारणाच्या कामात मोठी क्रांती घडून आली. यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही पाऊल उचलले होते. पावसाळ्यानंतर याच तलावातमधून पाणी साठल्याने कधीकाळी कोरडे पडणारे हे पाणीसाठे तुडुंब भरले आहेत. लोकांना त्यांच्याच केलेल्या कामाची पावती निसर्गाने दिल्याने मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. शिवारातील बंधाऱ्यामधून पाणी साठल्याने त्या परिसरातील विहिरी कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फायदा सध्या खरीप हंगामातील पिकांनाही होत आहे. सध्या सर्वत्र पावसाने ओढ दिली असली तरी शिवारात पाणी असल्याने पिके जोमात आहेत. धान्य पिकांचे उत्पादनात वाढ होेणार असल्याने ही हरितक्रांतीची बीजे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. पाण्यामुळे सर्व गावातून शिवारं जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील वर्षी पाणीटंचाईची समस्या आता भासणार नाही. जलसंधारणातील हेच काम औद्योगिकसह कृषी क्षेत्रातही योगदान देणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी) जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे, तलाव यातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही काम केले. ज्या गावातून मागणी झाली तेथे भरीव काम झाले. हजारो ब्रास माती गाळ काढल्याने पाणीसाठवणीबरोबर खडकाळ माळरानही ओलिताखाली आल्याचे दिसून येत आहे. -शिवाजीराव तळपे, तहसीलदार बावडा गावामध्ये लोकसहभागातून धरणतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. तालुक्यातील सर्वाधिक प्रमाणात गाळ या गावात काढण्यात आला. ओढाजोड प्रकल्पामुळे सध्या धरण तुडुंब भरले आहे. पाणीसाठा वाढल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीपाणी दोन्ही बाजू भक्कम आहेत. - मनोज पवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती