शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जललक्ष्मी योजनेतून वाईच्या पश्चिम भागात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:42 IST

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर ...

ठळक मुद्देचौदा गावांना लाभ : पाणी शिवारात आल्याने शेतकरी कामात व्यस्त शेतकऱ्यांकडून पाणी वाटपाचे वेळापत्रक

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर पार करत रब्बी हंगामातील पिकांना पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेऊन पिकांना पाणी देण्याच्या कामात व्यस्त आहेत.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमत: धोम व नंतर बलकवडी अशा दोन धरणांची निर्मिती झाली. गेली पन्नास वर्षे राज्यातील हजारो एकर जमिनीला व दुष्काळी भागात या धरणामुळे पाणी पोहोचले; मात्र ज्या तालुक्यातील जनतेने धरणासाठी आपल्या जमीन घरेदारे यांचा त्याग करून आपले सर्वस्व दुसºयासाठी दिले त्या तालुक्यातील शेतीपाण्याचा प्रश्न आजही संपला नाही. धोम धरण निर्मितीवेळी धरणग्रस्त व उर्वरित गावांना सहा टक्के पाणी साठा राखून ठेवला आहे. त्यातच व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाई ग्रामीण भाग शेती पाण्यापासून वंचित होता. जललक्ष्मी योजनेत याही भागाचा समावेश कित्येक वर्षांच्या शेतकºयांच्या लढ्यामुळे झाला. या शेती पाण्यासाठी पन्नास वर्षे शेतकरी वाट बघत होते.

गेल्या काही वर्षांत जललक्ष्मी योजनेचे काम पूर्ण झाले असून, बलकवडी धरणातून ग्रॅव्हिटीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे वयगाव, दह्याट, बोरगाव, धावली, मालतपूर, चिखली, मुगाव, दसवडी, न्हाळेवाडी, बोरीव, व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाईचा भाग ओलिताखाली येत आहे. काही दिवसांपूर्वी या पश्चिम भागातील गावांच्या शेतकºयांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यात पाणी वाटपाचे निर्णय व वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शेतीला पाणी देण्याचे काम सुरू आहे.

या योजनेमुळे धरण निर्मितीपासून शेती पाण्यापासून वंचित असणाºया चौदा गावांच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे. या योजनेच्या पाईपलाईनची गळती काढण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासकीय विभागाने त्वरित करावी, ही मागणी पश्चिम भागातील सर्व गावातील शेतकºयांची आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळाल्याने उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. 

 धोम धरण निर्मितीवेळी पश्चिम भागाला सहा टक्के पाणी राखून ठेवण्यात आले. मात्र उर्वरित वंचित भागाला शेती पाण्यासाठी या योजनेचा फायदा होणार असून, त्यासाठी अजून अधिक पाणीसाठा देण्यासाठी सर्व शेतकºयांच्या वतीने मागणी करणार आहोत.-दिलीप वाडकर, अध्यक्ष जललक्ष्मी पाणीपुरवठा योजनाजललक्ष्मी शेती पाणी योजनेच्या लाभार्थी सर्व गावांतील शेतकºयांनी आपल्या भिजणाºया शेतीच्या क्षेत्राची मागणी अर्ज तत्काळ भरून द्यावेत, पाईपलाईन गळतीचे काम संबंधित विभागाकडून काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. -मकरंद पाटील, आमदारजललक्ष्मी योजनेचा पाण्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला शेतीला पाणी मिळाल्याने आमचे उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटला आहे.-आनंदराव हगवणे,  शेतकरी कुसगाव, वाई

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी