शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

जललक्ष्मी योजनेतून वाईच्या पश्चिम भागात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:42 IST

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर ...

ठळक मुद्देचौदा गावांना लाभ : पाणी शिवारात आल्याने शेतकरी कामात व्यस्त शेतकऱ्यांकडून पाणी वाटपाचे वेळापत्रक

पसरणी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील चौदा गावांना शेती पाण्यासाठी वरदायिनी ठरणाºया जललक्ष्मी योजनेतून बंदिस्त पाईपलाइनद्वारे पंचवीस किलोमीटर अंतर पार करत रब्बी हंगामातील पिकांना पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेऊन पिकांना पाणी देण्याच्या कामात व्यस्त आहेत.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमत: धोम व नंतर बलकवडी अशा दोन धरणांची निर्मिती झाली. गेली पन्नास वर्षे राज्यातील हजारो एकर जमिनीला व दुष्काळी भागात या धरणामुळे पाणी पोहोचले; मात्र ज्या तालुक्यातील जनतेने धरणासाठी आपल्या जमीन घरेदारे यांचा त्याग करून आपले सर्वस्व दुसºयासाठी दिले त्या तालुक्यातील शेतीपाण्याचा प्रश्न आजही संपला नाही. धोम धरण निर्मितीवेळी धरणग्रस्त व उर्वरित गावांना सहा टक्के पाणी साठा राखून ठेवला आहे. त्यातच व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाई ग्रामीण भाग शेती पाण्यापासून वंचित होता. जललक्ष्मी योजनेत याही भागाचा समावेश कित्येक वर्षांच्या शेतकºयांच्या लढ्यामुळे झाला. या शेती पाण्यासाठी पन्नास वर्षे शेतकरी वाट बघत होते.

गेल्या काही वर्षांत जललक्ष्मी योजनेचे काम पूर्ण झाले असून, बलकवडी धरणातून ग्रॅव्हिटीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे वयगाव, दह्याट, बोरगाव, धावली, मालतपूर, चिखली, मुगाव, दसवडी, न्हाळेवाडी, बोरीव, व्याहळी, एकसर, कुसगाव, पसरणी व वाईचा भाग ओलिताखाली येत आहे. काही दिवसांपूर्वी या पश्चिम भागातील गावांच्या शेतकºयांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यात पाणी वाटपाचे निर्णय व वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शेतीला पाणी देण्याचे काम सुरू आहे.

या योजनेमुळे धरण निर्मितीपासून शेती पाण्यापासून वंचित असणाºया चौदा गावांच्या शेतीला पाणीपुरवठा होत आहे. या योजनेच्या पाईपलाईनची गळती काढण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासकीय विभागाने त्वरित करावी, ही मागणी पश्चिम भागातील सर्व गावातील शेतकºयांची आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळाल्याने उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. 

 धोम धरण निर्मितीवेळी पश्चिम भागाला सहा टक्के पाणी राखून ठेवण्यात आले. मात्र उर्वरित वंचित भागाला शेती पाण्यासाठी या योजनेचा फायदा होणार असून, त्यासाठी अजून अधिक पाणीसाठा देण्यासाठी सर्व शेतकºयांच्या वतीने मागणी करणार आहोत.-दिलीप वाडकर, अध्यक्ष जललक्ष्मी पाणीपुरवठा योजनाजललक्ष्मी शेती पाणी योजनेच्या लाभार्थी सर्व गावांतील शेतकºयांनी आपल्या भिजणाºया शेतीच्या क्षेत्राची मागणी अर्ज तत्काळ भरून द्यावेत, पाईपलाईन गळतीचे काम संबंधित विभागाकडून काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. -मकरंद पाटील, आमदारजललक्ष्मी योजनेचा पाण्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला शेतीला पाणी मिळाल्याने आमचे उत्पन्न वाढून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटला आहे.-आनंदराव हगवणे,  शेतकरी कुसगाव, वाई

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी