शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे धरणांतील पाणी पेटणार; सातारा, कोरेगावचे शेतकरी आक्रमक

By नितीन काळेल | Updated: January 22, 2024 19:07 IST

कोयनेच्या पाण्यावरुन सांगली-साताऱ्यात वाकयुध्द सुरूच

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळीस्थिती आहे. यामुळे कोयनेतील पाण्यावरुन सांगली जिल्ह्याने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आता कण्हेर, उरमोडी धरणातील पाण्याबाबत सातारा, काेरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आंदोलन करणार आहेत. साताऱ्यातील पाटबंधारे विभागात मंगळवारी धडक देणार आहेत. त्यामुळे धरणांतील पाणी पेटण्याची चिन्हे आहेत.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. या भागात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तीन ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. याच भागात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयनासारखे धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. तर पश्चिम भागातच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी अशी मोठी धरणेही आहेत. या भागातील प्रमुख सहा धरणांची पाणीसाठवण क्षमता तब्बल १४८ टीएमसी इतकी आहे. तर पश्चिम भागातच अनेक छोटी धरणेही आहे. त्याचाही खूप मोठा फायदा होत असतो.

या धरणांतील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच सिंचन योजनाही आहेत. यासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आवर्तनानुसार पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत सिंचनासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत वाद झाले नाहीत. पण, यावर्षी धरणातील पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. याला कारण अपुरे पर्जन्यमान.

जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता. मान्सूनचा पाऊस तर अवघा ६५ टक्केच बरसला. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस पडतो. पण, ५७९ मिलीमीटरच पाऊस पडला. यामुळे तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट झाली. त्यानंतर परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही. परिणामी प्रमुख धरणे भरली नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षी नाेव्हेंबर महिन्यापासून सिंचनाच्या पाण्यासाठी मागणी होऊ लागली. कोयना धरणातून आतापर्यंत अनेकवेळा सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यावरुन सांगली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय वाकयुध्द रंगले आहे. कारण, कोयनेतील पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे.

यापार्श्वभूमीवर कोयना धरण भरले नसल्याने पाण्यावरुन सतत संघर्ष सुरू आहे. असे असतानाच आता जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, धोम धरणातील पाण्यावरुन संघर्ष उद्भभवू पाहत आहे. सातारा, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक पवित्र्याच्या भूमिकेत आहेत. यासाठी दि. २३ जानेवरी रोजी साताऱ्यातील कृष्णानगरच्या पाटबंधारे विभागात जाऊन बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी करत शेतकरी अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. यामुळे धरणांतील पाणी पेटण्याचीच चिन्हे आहेत.

कण्हेर, उरमोडी धरणातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा वापर बेकायदेशीररित्या होत आहे. सातारा, कोरेगाव, कऱ्हाड आदी तालुक्यात दुष्काळ असतानाही कृष्णा नदीतून जिहे-कटापूर योजनेचे पाणी पळवले जात आहे. याविरोधात वारंवार आवाज उठवला. पण, आता राजकीय झेंडे बाजुला ठेवून एकत्र येणार आहे. यासाठी दि. २३ जानेवारी रोजी कृष्णा सिंचन भवनमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. तसेच बेकायदेशीर सोडण्यात आलेले पाणी बंद करायला लावणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणीdroughtदुष्काळ